10th Exam : दहावी जून-जुलै पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा ३६ टक्के निकाल

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यासह नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ३८ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ५७६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी १३ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३६.४८ आहे.

10th Exam : दहावी जून-जुलै पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा ३६ टक्के निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) जून-जुलै २०२५ (June-July 2025 Supplementary Examination) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (दुपारी १ वाजता) मंगळवार २९ जुलै रोजी जाहीर (10th exam results announced)  करण्यात आला आहे. या परीक्षेत ३६ टक्के विद्यार्थ्यी उतीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना नियमित अकरावी वर्गात प्रवेश मिळणार आहेत.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण यासह नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ३८ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ५७६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी १३ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३६.४८ आहे. तसेच एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १३,३८९ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ए.टी.के.टी. (ATKT) सवलतीद्वारे इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरतात.

SPPU:पीएचडीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात; गाईडकडून रिक्त जागांची माहिती मागवली

आत्तापर्यंत फेब्रुवारी-मार्च च्या परीक्षेसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करण्यात येत होती. मात्र, अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात होते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून यावर्षी प्रथमच जून-जुलै २०२५ च्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणुन प्रविष्ट होण्याकरिता नावनोंदणीसाठी संधी देण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेत पास घालेल्या विद्यार्थ्यांना नियमित अकरावी वर्गात प्रवेश मिळणार आहे.

गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत ३० जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्यात आली असून त्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये एवढा शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी प्रति विषय ४०० रुपयेइतके शुल्क ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात प्रति विषय ३०० रुपये प्रमाणे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.