पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू

सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची (बीए, बी. कॉम, बीएससी) परीक्षा सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू होईल. सध्या प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक हे तात्पुरते असून काही दिवसांत ते अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) सत्र परीक्षाचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध (Tentative schedule released) केले आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार (Exams start from November 6) आहेत. सुरुवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची (बीए, बी. कॉम, बीएससी) परीक्षा सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा (Vocational Course Examination) सुरू होईल. सध्या प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक हे तात्पुरते असून काही दिवसांत ते अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. 

प्रथम व द्वितीय या दोन्ही वर्षांत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा दोन्हीपैकी एका वर्गातील सर्व विषय निघाले, पण एका वर्गातील काही विषय राहिले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता 'कॅरीऑन'च्या माध्यमातू्न थेट तृतीय किंवा अंतिम वर्षासाठी प्रवेश घेण्याची संधी विद्यापीठाने दिली आहे. आता नोव्हेंबरपासून सुरू होणारी सत्र परीक्षा त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून विद्यापीठाने त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. परंतु, या सत्र परीक्षेत पहिल्या दोन वर्षांतील अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यास पुन्हा पूर्वीच्याच वर्गात बसावे लागणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी १०९ महाविद्यालये संलग्न आहेत. या विद्यार्थ्यांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रिन पद्धतीने होणार आहेत. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनमधून नोकरीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे परीक्षा वेळेत घेऊन निकालही वेळेत प्रसिद्ध व्हावेत, यादृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. निकाल आणखी कमी दिवसांत जाहीर व्हावेत, यासाठी विद्यापीठाकडून वारंवार सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.