प्राध्यापक भरतीला सुरुवात; नवीन गुणांकन पद्धतीचा अवलंब
निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नि:पक्षता येण्यासाठी राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील अकृषी विद्यापीठांत अध्यापक (Professor recruitment) पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब (Adoption of new procedures) होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे.
राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये, शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरुन शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेले उमेदवारच अंतिम निवडीसाठी पात्र असतील. निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने चित्रीकरण सीलबंद करण्यात येईल. मुलाखती पूर्ण होताच, त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. या सुधारित कार्यपद्धतीमुळे विद्यापीठांमध्ये पारदर्शक आणि जलद निवड प्रक्रिया पूर्ण होऊन गुणवत्ताधिष्ठित अध्यापकांची निवड होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दरम्यान, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे याबाबतचा अध्यादेशही प्रसिध्द करण्यात आला आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठांत अध्यापक (Teachers) पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नि:पक्षता येण्यासाठी राज्यात अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 27, 2025
मा. राज्यपाल तथा कुलपती यांच्या… pic.twitter.com/YkctzhkwLZ