आरटीई प्रवेशाला पालकांचा अल्प प्रतिसाद; नियम बदलाचा फटका 

दरवर्षी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक पालक आरटीई प्रवेशासाठी अर्ज करत असल्याचे दिसून येते.यंदा पुणे जिल्ह्यातील 905 शाळांमधील 17 हजार 509 जागांसाठी केवळ 16 हजार 752 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीई प्रवेशाला पालकांचा अल्प प्रतिसाद; नियम बदलाचा फटका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई 25% आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही अद्याप प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले नाहीत. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमात केलेल्या बदलामुळे पालकांकडून प्रवेश प्रक्रियेस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या नियमांमध्ये बदल करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील 8 हजार 651 शाळांमधील एक लाख 12 हजार 772 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी येत्या 10 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, 25 फेब्रुवारीपर्यंत 85 हजार 910 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अमरावती व नागपूर हे दोन जिल्हे वगळता एकाही जिल्ह्यात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले नाहीत. दरवर्षी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक पालक आरटीई प्रवेशासाठी अर्ज करत असल्याचे दिसून येते.यंदा पुणे जिल्ह्यातील 905 शाळांमधील 17 हजार 509 जागांसाठी केवळ 16 हजार 752 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत बदल केला. विद्यार्थ्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळेमध्ये पूर्वी अर्ज करता येत होता. मात्र, यंदा या नियमात बदल करण्यात आला असून केवळ  एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेशासाठी अर्ज करता येतो. अनेक भागात घरापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत शाळाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

नगरपालिका महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुमारे 50 टक्क्यांहून अधिक आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. तसेच बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पालक या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास उत्सुक नाहीत. बहुतांश पालक हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी उत्सुक आहेत. परंतु, घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळेत प्रवेश देण्याबाबत नियम केल्यामुळे अनेक पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण त्यांच्या घराजवळ एक किलोमीटर अंतरावर एकही इंग्रजी माध्यमाची शाळा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील पालकांसमोर मोठ्या प्रमाणावर ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा अनेक ठिकाणी प्रवेशक क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा निहाय उपलब्ध जागा व प्राप्त अर्जांची आकडेवारी

District RTE Vacancy Total Applications
Ahilya Nagar 3765 2198
Akola 1977 1709
Amravati 2542 2720
Bhandara 913 1071
Bid 2400 1186
Buldana 2933 1559
Chandrapur 1630 1549
Chhatrapati Sambhaji Nagar 4823 4590
Dharashiv 1241 659
Dhule 1267 905
Gadchiroli 540 257
Gondiya 1042 987
Hingoli 893 399
Jalgaon 3310 2654
Jalna 2567 1005
Kolhapur 3299 1157
Latur 2251 1458
Mumbai 4558 3055
Mumbai 1381 --"--
Nagpur 6994 8934
Nanded 2750 2360
Nandurbar 338 222
Nashik 5622 4997
Palghar 5685 2184
Parbhani 1535 872
Pune 17509 16752
Raigarh 4739 3405
Ratnagiri 804 307
Sangli 2097 780
Satara 2040 1478
Sindhudurg 271 19
Solapur 2892 1413
Thane 11595 9480
Wardha 1390 1370
Washim 1007 644
Yavatmal 2172 1575
Total 112772 85910