11th Admission : अकरावी प्रवेशाची 'ओपन टू ऑल' फेरी, ४ लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी केवळ ७ लाख ३५ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी विविध फेऱ्यांमधून प्रवेश निश्चित केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या (11th admission process) तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही ४ लाख १४ हजार ४४४ विद्यार्थी (4,14,444 students awaiting admission) अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी २९ जूनपासून सुरू (Starting from June 29) होणारी 'ओपन टू ऑल' (विशेष फेरी-१) ('Open to All' round) ही निर्णायक संधी ठरणार आहे. या फेरीत पूर्वीच्या पसंतीक्रमाचे बंधन नसल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध रिक्त जागांनुसार कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात अर्ज करण्याची मोकळीक मिळणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६४९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी केवळ ७ लाख ३५ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी विविध फेऱ्यांमधून प्रवेश निश्चित केला आहे. तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यावरही मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रतीक्षेत असल्याने विशेष फेरीची गरज निर्माण झाली आहे.
तिसऱ्या नियमित फेरीत ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी भाग-१ व भाग-२ अर्ज लॉक केले होते. यापैकी १ लाख ८१ हजार ९३१ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले, मात्र केवळ १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनीच २५ जूनपर्यंत प्रवेश निश्चित केला. याचा अर्थ सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट मिळूनही प्रवेश घेतला नाही. या रिक्त जागांसह इतर उपलब्ध जागांवर 'ओपन टू ऑल' फेरीत प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या विशेष फेरीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पसंतीक्रमाचे बंधन राहणार नाही. ते रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार कोणत्याही महाविद्यालयासाठी अर्ज करू शकतील. पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या किंवा अद्याप प्रवेश न मिळालेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी ही फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
विद्यार्थ्यांनी रिक्त जागांची यादी, कटऑफ मार्क्स आणि प्रवेश वेळापत्रक बारकाईने तपासावे, असे सल्ला देण्यात आला आहे. 'ओपन टू ऑल' फेरीत जलद आणि योग्य निर्णय घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. शासनाने या फेरीला यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले जात आहे.