शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होणे अशक्य; शाळेची घंटा जूनमध्येच वाजणार

शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यासाठी एप्रिल महिन्यांपूर्वी नियोजन करावे लागेल. मात्र, बालभारतीकडून यावर्षी जून महिन्यातच पुस्तक वितरण केले जाणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर या वर्षांपासून इयत्ता पहिलीची पुस्तके ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार तयार करून छापली जाणार आहे. मात्र, शासनाकडून अद्याप पुस्तक छपाईबाबत बालभारतीला आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणे अशक्य आहे.

शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होणे अशक्य; शाळेची घंटा जूनमध्येच वाजणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू करण्याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्वच घटकांना त्यादृष्टीने तयारी करावी लागते. परंतु, नवीन पुस्तके तयार करणे (Creating new books), संस्थांचालक (Director), शिक्षक (teachers), मुख्याध्यापक संघटना (Principals' Association) यांच्यासह पालकांना (parents) विश्वासात घेणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने (Department of Education) यातील काहीही केले नाही. परिणामी 2025-26 हे शैक्षणिक वर्ष (new academic year) एप्रिल महिन्यात सुरू करणे शक्य नसून (academic year 2025-26 not possible to start in April.) या वर्षीही जून महिन्यातच शाळेची घंटा वाजणार (Schools will start in June) आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त (State Education Commissioner) यांनीही याबाबत स्पष्टीकारण दिले आहे.

शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यासाठी एप्रिल महिन्यांपूर्वी नियोजन करावे लागेल. मात्र, बालभारतीकडून यावर्षी जून महिन्यातच पुस्तक वितरण केले जाणार आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर या वर्षांपासून इयत्ता पहिलीची पुस्तके ही सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार तयार करून छापली जाणार आहे. मात्र, शासनाकडून अद्याप पुस्तक छपाईबाबत बालभारतीला आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणे अशक्य आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सर्व बाबींचे नियोजन करावे लागते. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व पालक या सर्व घटकांना विश्वासात घेणे अपेक्षित आहे. मात्र, त्या दृष्टीने शिक्षण विभागाने कोणतीही तयारी केलेली नाही. परिणामी नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यांपासूनच सुरू होणार आहे. भौगोलिक परिस्थिती व हवामान यांचा विचार करून मगच शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयात बदल केला जाईल. यंदा जून महिन्यांपासूनच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग (State Education Commissioner Sachindra Pratap Singh) यांनी स्पष्ट केले आहे.