विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत; शासनाचे आदेश, काय आहे कारण

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत; शासनाचे आदेश, काय आहे कारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ (temperature rise) झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट (Heat wave) पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत (Exemption of students from attending school)देणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या सोमवारपासून (दि.22)या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

 राज्यामध्ये काही दिवसांपासून विदर्भ माराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातही तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे.त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहेत.

शिक्षण आरटीईच्या मुलांना शाळा बादलावीच लागणार; शासन आठवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.तसेच राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.तसेच वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी,असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढले आहे. 
दारम्यान, राज्यात उष्णतेची लाट असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा,असे पत्र नुकतेच महाराष्ट्र नावनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज्य ठाकरे यांनी शासनाला दिले होते.