अभियांत्रिकी ही केवळ यंत्रांची नव्हे, तर माणसांच्या समस्या सोडवण्याची कला आहे - प्रा. मिलिंद जोशी
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थिनींना सतत शिकत राहण्याचा सल्ला दिला आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उत्तम अभियंते बनण्याचे आवाहन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात (Bharati University Women's College of Engineering) अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ(Farewell ceremony for final year students) पार पडला. याप्रसंगी नामवंत लेखक, प्रसिद्ध वक्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Renowned writer, famous speaker and President of All India Marathi Literature Association Prof. Milind Joshi) यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांनी बोलताना, अभियांत्रिकी ही केवळ यंत्रांची नव्हे, तर माणसांच्या समस्या सोडवण्याची कला असल्याचं म्हटलं आहे.
याबरोबरच, त्यांनी विद्यार्थिनींना समाजाभिमुख विचार करण्याचा आणि मानवी गरजांवर लक्ष केंद्रीत करत नवोन्मेष करण्याचा सल्ला दिला. मूल्यांशी निष्ठावान राहून जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप जाधव होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थिनींना सतत शिकत राहण्याचा सल्ला दिला आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून उत्तम अभियंते बनण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित पाहुण्यांशी थेट संवाद साधला, ज्यात प्रा. मिलिंद जोशींनी आपले अनुभव, प्रेरक किस्से आणि विचार स्पष्टपणे मांडले. या कार्यक्रमात नृत्य, गायन, अभिनय, आणि कविता सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही आणि आनंददायी झाले.
यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ. अविनाश पवार, उपप्राचार्या प्रा. डॉ. सुवर्णा चोरगे, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. किरण येसुगडे, प्रा. नेहा बोन्सले, प्रा. सोनल पाटील आणि प्रा. यशोमती धुमाळ यांनी केले.