'या' मागणीसाठी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार!
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सरकार (state government) जोपर्यंत 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी (Implementation of government decision) करणार नाही, तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात दहावी-बारावीच्या पेपर तपासणी बहिष्कार (10th-12th paper examination boycott) घातला जाईल, अशी भूमिका आमदार जयंत आसगावकर (MLA Jayant Aasgavkar) तसेच कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे (State Vice President of Action Committee Khanderao Jagdale) यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात आला. परंतु, ४ महिने झाले तरीही शासन याबाबत कोणतीही तरतूद करताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात हा निधी मंजूर होणे आवश्यक होते. पण राज्य सरकारने अद्याप याबाबत काहीही निर्णय घेतला नाही. येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनात १४ ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधानपरिषद मधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिली आहेत.
यादरम्यान इयत्ता बारावीचे तपासणीसाठी आलेले पेपर कोल्हापूर बोर्डाकडे परत करण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही प्रकारे पेपर तपासले जाणार नाहीत यावर सर्व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती ठाम असून यावर निर्णय घेतला जात नाहीत तोपर्यंत पेपर तपासले जाणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांना देण्यात आले. त्यावेळी आ.जयंत आसगावकर, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, शिवाजी घाटगे, भाग्यश्री राणे, रेश्मा सनदी, सचिन चौगुले, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, संतोष पाटील, सचिन पाटील, सावंता माळी यासह शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
-------------------------------------------
टप्प्यावरील आमचे शिक्षक गेले कित्येक वर्ष विनावेतन काम करत आहेत. आजपर्यंत त्यांचा टप्पावाढीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शासनाकडून केवळ चालढकल सुरू आहे. त्यामुळे टप्पावाढीचा आदेश जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत आमचा दहावी, बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार राहील तसेच भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल.
- जयंत आसगावकर, आमदार