रक्तरंजित थरार! विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला, मित्राने अंगावर वार घेत वाचवला प्राण

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी दोघेही बदलापूर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. ते एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते, मात्र ती त्याच्याशी बोलत नसल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची आरोपीने कबुली दिली आहे.

रक्तरंजित थरार! विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला, मित्राने अंगावर वार घेत वाचवला प्राण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबईतील मुलुंड (Mulund Crime News) परिसरात एका नामांकित कॉलेजच्या परिसरात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला (Lethal Attack on a Female Student) केला. या जीवघेण्या हल्ल्यावेळी पीडितेच्या एका मित्राने देवदूतासारखे धावून येत आरोपीचा वार स्वतःच्या अंगावर झेलला आणि तरुणीचे प्राण (A friend saved a life) वाचवले.कॉलेज परिसरात (Incident on College Premises) भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या थरारक घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नेहमीप्रमाणे मुलुंड येथील तिच्या कॉलेजमध्ये आली होती. यावेळी बदलापूर येथे राहणारा २१ वर्षीय आरोपी आशिष गौतम बनसोडे तिथे पोहोचला. त्याने पाठीमागून येऊन पीडित मुलीला पकडले आणि 'तू माझ्याशी का बोलत नाहीस?' असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या माथेफिरूने आपल्याकडे असलेला धारदार कोयता काढून तिच्यावर वार केला त्याच क्षणी जवळच असलेल्या पीडित मुलीचा मित्र मध्ये आला. त्याने तरुणीला वाचवण्यासाठी स्वतःला झोकून दिले, ज्यामुळे आरोपीने केलेला कोयत्याचा वार थेट त्याच्या पाठीवर बसला. या हल्ल्यात तो मित्र गंभीर जखमी झाला आहे. 

दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपी आशिष बनसोडे घटनास्थळावरून फरार झाला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा 24 तासांच्या आत छडा लावला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी दोघेही बदलापूर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. ते एकमेकांना पहिल्यापासून ओळखतात. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते, मात्र ती त्याच्याशी बोलत नसल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची आरोपीने कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.