'लॉ'च्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय बदलाची मोठी संधी! १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू
उच्च शिक्षण संचालनालयाने (DHE) विधी अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीईटी सेलच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) अंतर्गत तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या लॉ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
उच्च शिक्षण संचालनालयाने (DHE) विधी अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीईटी सेलच्या केंद्रीकृत प्रवेश (Centralized access to CET Cell) प्रक्रिया (कॅप) अंतर्गत तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या लॉ (Under three years and five years of law) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar)यांनी याबाबत परिपत्रक जारी केले असून, अर्ज प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू (Application process starts from August 1)होणार आहे. विद्यार्थ्यांना १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याने ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरली आहे.
केवळ कॅप प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थीच या महाविद्यालय बदल प्रक्रियेसाठी पात्र आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयातून सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयात संस्थाबदल करता येणार नाही. तसेच, एका शैक्षणिक वर्षात फक्त एकदाच महाविद्यालय बदलाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी इच्छित महाविद्यालयात दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जासोबत ना-हरकत प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कॅप प्रवेश पत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. संबंधित महाविद्यालये कागदपत्रांची पडताळणी करून रिक्त जागांची तपासणी करतील.
महाविद्यालयांकडून २४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाकडे पाठवले जातील. संचालनालयाच्या मान्यतेनंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण असणे, रिक्त जागा उपलब्ध असणे आणि गुणवत्तेनुसार निवड होणे हे प्रवेशासाठी महत्त्वाचे निकष राहतील. विद्यापीठाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच संस्थाबदल वैध ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षानंतर संस्थाबदलाची सोय उपलब्ध असताना, आता लॉ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात शिकण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. मात्र, नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.