भारत - पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'या' सहा राज्यांकडून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक किलोमीटर लांब सीमा आहे. पंजाब राज्यातून ही सीमा सुमारे 532 किमी आहे, राजस्थानातून 1070 किमी तर गुजरातमधून 506 किमी लांब आहे. याशिवाय, पश्चिम बंगालची सीमा बांग्लादेशसोबत 2,217 किलोमीटर लांब आहे.

भारत - पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'या' सहा राज्यांकडून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
पाकिस्तानने भारताच्या सात शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारतानेही प्रतिउत्तर देत पाकिस्तानच्या  महत्वाच्या शहरांवर हल्ला चढवला. त्यामुळे आता भारत - पाक युद्ध जवळपास निश्चित समजले जात आहे. (india pakistan war) अशा परिस्थितीत देशातील काही राज्यांनी पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  (some  states  decide to close  schools and colleges)
काश्मीरसह  पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालने मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणच्या सरकारी अधिकारी, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील शाळांना पुढील आदेशापर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक किलोमीटर लांब सीमा आहे. पंजाब राज्यातून ही सीमा सुमारे 532 किमी आहे, राजस्थानातून 1070 किमी तर गुजरातमधून 506 किमी लांब आहे. याशिवाय, पश्चिम बंगालची सीमा बांग्लादेशसोबत 2,217 किलोमीटर लांब आहे.

पंजाबमधील काही शाळा पूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या शाळा आणि महाविद्यालय राज्यातील सीमावर्ती जिल्हे – फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, गुरदासपूर आणि अमृतसर – येथे स्थित आहेत. या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा आदेश संपूर्ण पंजाब राज्यात लागू करण्यात आला आहे.

याशिवाय, काश्मीरमधील स्कूल एज्युकेशन डायरेक्टर यांनीही काही जिल्ह्यांतील शाळांसाठी सुट्ट्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये कठुआ, बारामुला, कुपवाडा, श्रीनगर आणि अवंतीपोरा येथील शाळांचा समावेश आहे. हे आदेश 9 आणि 10 मेसाठी लागू होते, मात्र आता हा निर्णय  संपूर्ण प्रदेशात लागू करण्यात आले आहेत.