प्रश्नपत्रिकेवर तुमचे निरीक्षण योग्य पद्धतीने पाठवा ; बोर्डाकडून शाळांना सूचना
दरवर्षी सीबीएसई शाळांना बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत त्यांचे विचार आणि समस्या OECMS द्वारे बोर्डाला पाठवण्याची विनंती करते, परंतु या संदर्भात असे आढळून आले आहे की, शाळा सहसा वेगवेगळ्या ईमेल आयडीवर त्यांचे अभिप्राय पाठवतात, किंवा संबंधित विषयाची परीक्षा घेतल्यानंतर अनेक दिवसांनी टिप्पण्या पाठवल्या जातात. ज्यामुळे उद्देश पूर्ण होत नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education) CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षांच्या दरम्यान सीबीएसई बोर्डाने एक महत्त्वाची माहिती प्रसिध्द केली आहे. त्यानुसार, सीबीएसई बोर्डाने शाळांना बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांवर त्यांचे अभिप्राय स्पष्ट आणि योग्यरित्या पाठवण्यास सांगितले आहे. (Schools have been asked to send their feedback on board exam question papers clearly and correctly.) या संदर्भात बोर्डाने अधिकृत वेबसाइट www. cbse.gov.in /cbsenew/ cbse.html यासंदर्भात एक अधिसूचना देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार, दरवर्षी सीबीएसई शाळांना बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत त्यांचे विचार आणि समस्या OECMS द्वारे बोर्डाला पाठवण्याची विनंती करते, परंतु या संदर्भात असे आढळून आले आहे की, शाळा सहसा वेगवेगळ्या ईमेल आयडीवर त्यांचे अभिप्राय पाठवतात, किंवा संबंधित विषयाची परीक्षा घेतल्यानंतर अनेक दिवसांनी टिप्पण्या पाठवल्या जातात. ज्यामुळे उद्देश पूर्ण होत नाही. शिवाय, शाळांनी प्रश्नपत्रिकांवरील पाठवलेला अभिप्राय अनेकदा अस्पष्ट असतो. उदाहरणार्थ, प्रश्न बरोबर नाही, परंतु प्रश्नात काय चूक आहे याचा उल्लेख केलेला नाही.
शाळांनी खाली दिलेल्या नमुन्यानुसार त्यांचे प्रतिसाद पाठवणे महत्वाचे आहे.
* शाळांनी त्यांचे प्रतिसाद OECMS पोर्टलवर अपलोड करावेत.
* प्रश्नपत्रिकेवरील तुमचा अभिप्राय परीक्षा आयोजित करण्याच्या दिवशीच शाळांना पाठवावा.
* या विषयाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, शाळा qpobservation@cbseshiksha.in वर मेल पाठवून माहिती मिळवू शकतात.