खुशखबर! सारथी संस्थेला कोट्यवधींचा निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध 

सारथी ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेली प्रमुख संस्था आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था विशेष कार्य करते. येथे MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे आणि इतर शासकीय नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग आणि विद्यावेतन दिले जाते.

खुशखबर! सारथी संस्थेला कोट्यवधींचा निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या (Maratha students) भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था' (सारथी) यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३५ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर (Funds of ₹35 crore sanctioned) करण्यात आला आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो मराठा विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

सारथी ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेली प्रमुख संस्था आहे. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही संस्था विशेष कार्य करते. येथे MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे आणि इतर शासकीय नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत कोचिंग आणि विद्यावेतन दिले जाते. संशोधन आणि विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निधीमुळे संस्थेच्या क्षमता वाढणार असून, अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळू शकेल. विशेषतः ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल.

नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार, हा निधी “मागासवर्गीयांचे कल्याण” अंतर्गत मराठा समाजाच्या कल्याणासाठी विशेषतः वितरित करण्यात आला आहे. निधी खर्च करताना सर्व वित्तीय नियमांचे पालन करणे आणि उपयोगिता प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे ही संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांची जबाबदारी राहील.

या निर्णयामुळे सारथी संस्थेतर्फे अधिक चांगल्या सुविधा, नवीन बॅचेस आणि विस्तारित प्रशिक्षण कार्यक्रम राबवता येणार आहेत. मराठा समाजातील युवक-युवतींच्या नोकरीच्या संधी वाढवण्याच्या दिशेने हा एक सकारात्मक आणि ठोस पाऊल मानले जात आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे.