१०वी, १२वी परीक्षेतील सर्व काॅपी प्रकरणाची चौकशी होणार, शिक्षण राज्यमंत्र्यांनी मांडली रोखठोक भूमिका
सर्व परीक्षा केंद्रावर उत्तम व्यवस्था होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांना काही गैरसोयी होत आहेत की नाही त्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान हे देखील चालवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नागपूर विभागात काही परीक्षा केंद्रावर त्यांनी पाहाणी केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सध्या राज्यात महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी व बारावीची परीक्षा (10th and 12th board exams) घेतली जात आहे. राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान (Copy-free campaign) राबवले जात आहे. मात्र, कॉपी, गैरप्रकार, पेपरफुटी, (Copying irregularities, paper breakage) सीसीटीव्ही बंद करणे, कॉपी पुरवणे तसेच परीक्षा केंद्रावरील सुविधांचा अभाव यामुळे या परीक्षा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत . बीड, चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी कॉपी प्रकरणे उघड झाली आहेत. अशातच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Minister of State for Education Pankaj Bhoyar) यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी माध्यमांनी त्यांना सर्व प्रकरणावर प्रश्न विचारले असता त्यांनी यावर रोखठोक भूमिका मांडली. सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व परीक्षा केंद्रावर उत्तम व्यवस्था होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाची आहे. विद्यार्थ्यांची गैरसोयी होत आहे की नाही त्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान हे देखील राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नागपूर विभागात काही परीक्षा केंद्रावर त्यांनी पाहाणी केली.
नागपूरमध्ये एक घटना उघडकीस आली आहे. त्यात सतर्क असलेल्या पर्यवेक्षकामुळे ही घटना समोर आली. तातडीने शिक्षण विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. समाजात जशा काही चांगल्या प्रवृत्ती असतात तशाच काही वाईट प्रवृत्ती असतात. त्यांच्यावर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या-ज्या ठिकाणी घडल्या असतील त्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभागचे आणि गृह विभागाचे आहे. त्यामुळे त्यातून कोणीही सुटणार नाही. मधल्या काळात बीडची घटना समोर आली. त्यात कारवाई करण्यात आली. संभाजीनगरमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत, एका ठिकाणी जवळपास 24 लोकांना निलंबितही करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला आहे, त्याची सत्यता तपासण्यात येत आहे. जर त्यामध्ये सत्यता आढळली तर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने परीक्षा राबवण्याची व्यवस्था करण्यात आली त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत, असल्याचे मंत्री भोयर म्हणाले.
नागपूर पेपर फुटी प्रकरणात एक विद्यार्थिनी वॉशरूमच्या बाहाण्याने बाहेर जात होती. दहा ते बारा मिनिटे ती परत येत नव्हती, ही गोष्ट आमच्या परीक्षा पर्यवेक्षकांना लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी केली. चौकशी केल्यावर तो प्रकार उघडकीस आला आणि एक व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो प्रकार होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे, त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून नागपूर विभागाचे उपसंचालक यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
खाजगी कोचिंग क्लास असो किंवा खाजगी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणी व्यक्ती असो यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बीड प्रकरणावर ते म्हणले, मंडप टाकून अशी कुठल्याही केंद्रावर परीक्षा देता येत नाही, मात्र असे जर घडले असेल तर त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंजक भोयर यांनी माध्यमांनी दिली आहे.