विदर्भातील शाळाच्या वार्षिक परीक्षा लवकर घ्या; न्यायालयाचे आदेश
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विदर्भातील इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक PAT परीक्षा त्वरित घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विदर्भातील कडक उन्हाळ्याची परिस्थिती ही महत्त्वाची बाब आहे. विदर्भातील तापमान 15 एप्रिल नंतर 42 ते 45 C च्या (Temperature in Vidarbha 42 to 45 C) जवळपास असते. तसेच खेडेगावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यासाठी 2 ते 5 किमीचे अंतर पायी पार करावे लागते. अशी भयावह परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (Maharashtra State Council of Educational Research and Training) विदर्भातील इयत्ता १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक PAT परीक्षा (PAT Exam 2024-25) लवकर घ्याव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
वरिष्ठांची परवानगी घेऊन वेळापत्रकात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. विदर्भात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांना गंभीर त्रास होतो. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय करण्यासाठी गावखेड्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असतात. त्यामुळे मागील काही वर्षात लवकरच परीक्षा संपून २१ एप्रिलपर्यंत शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या जायच्या. परंतु, २७ फेब्रुवारी रोजीच्या परिपत्रकात वर्ग 1 ते 4 च्या परीक्षा 22 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेयच्या असे निदेश देण्यात आले. मात्र, हे वेळापत्रक जाचक असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक पण आहे. पालक सुध्दा त्यामुळे चिंतेत असून शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक पण चिंतेत आहेत. एकंदरीत सर्वच दृष्टीने सदर वेळापत्रक हिताचे नसल्याचे यावेळी म्हटले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा आणि PAT परीक्षा एकत्रित घेण्यात याव्यात या विचाराने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यावर मुख्याध्यापक संघ तसेच व्यवस्थापन महामंडळानी आक्षेप घेऊन निवेदन सादर केली होती. परंतु, त्याचा विचार झाला नाही. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या, नागपूर खंडपीठ रिट याचिका दाखल करण्यात आली. यावर ७ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थिती किंवा स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शिक्षणाधिकारी वेळापत्रकात बदल करू शकतात, असे कोर्टाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे.
इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेऊन ती १७ एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. प्रत्येक शाळाचे वार्षिक नियोजन पूर्ण झालेले आहे. प्रशिक्षण परिषदेचे सध्याचे वेळापत्रक विद्यार्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. वेळापत्रकात वर्ग 6 ते 8 च्या परीक्षा अगोदर व वर्ग 1 ते 5 च्या परीक्षा नंतर असे आक्षेपार्ह वेळापत्रक जाहीर करण्यात आले. हे वेळापत्रक (वर्ग 1 ते 5) विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहे. कारण एकजरी दुर्देवी घटना घडली तर त्याकरिता जबाबदार कोण असेल याचा पण विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणते अधिकारी जबाबदार ठरतील याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागपूर यांनी त्वरेने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने वेळापत्रक निर्गमित करून विदर्भातील किमान वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने केली आहे.
----------------------