नवोदयच्या धर्तीवर शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांना खानवडी शाळेत शिक्षण
पुरंदर तालुक्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेची पहिल्यांदाच बारावी पर्यंतची खानवडी गावात वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ सुरू करण्यात येणार आहे. या शाळेसाठी नुकताच पुणे जिल्हा परिषद, राज्य शासन आणि क्रिस्टल हाऊस इंडिया या स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिष्यवृत्ती (Scholarship eligible students) परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून गुणवत्ता यादीत झळकत आहेत. आपल्या बुद्धीमत्तेच्य बळावर हे विद्यार्थ्यांचा नावलौकिक पाहायला मिळत आहे. अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन या त्यांना खानवडीच्या शाळेत प्रवेश (Khanwadi School Admission) देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. शिवाय या विद्यार्थ्यांना नवोदयच्या धर्तीवर शिक्षण (Navodaya Education) मिळणार आहे.
पुरंदर तालुक्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेची पहिल्यांदाच बारावी पर्यंतची खानवडी गावात वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ सुरू करण्यात येणार आहे. या शाळेसाठी नुकताच पुणे जिल्हा परिषद, राज्य शासन आणि क्रिस्टल हाऊस इंडिया या स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे. या शाळेमध्ये इतर मुलांच्या प्रवेशासोबतच आता शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी आणि आठवीमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
या विद्यार्थ्यांना सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मिळणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्ह्यातील दोन्ही वर्गातील मिळून १२५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. इयत्ता पाचवीतील ६८ विद्यार्थी गुणवत्ता यादी आले, त्यापैकी ४७ विद्यार्थी हे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी पुढील वर्षी खानवडी शाळेत प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा अथवा नाही हे ऐच्छिक असणार आहे. मात्र, हे गुणवान विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आणखी प्रयोग करून गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.