व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा, जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ 

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर अर्जाच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासा, जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी (Academic year 2026-27) अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (Professional Courses) प्रवेश प्रक्रियेत SEBC व OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (SEBC and OBC students) महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ (6-month extension) देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने (Higher and Technical Education Department) प्रसिद्ध केला आहे.
याबाबत माहिती देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक SEBC आणि OBC विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात तांत्रिक व प्रशासकीय अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर अर्जाच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या मुदतीत प्रमाणपत्र सादर करण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.
या मुदतीत प्रमाणपत्र सादर करणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार आहे. निर्धारित ६ महिन्यांच्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहील. ही मुदत अंतिम असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत वेळेत प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देणारा ठरेल. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत शासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतल्याने सामाजिक न्यायाची भावना बळकट होत आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा योग्य वापर करावा.