रॅगिंगच्या नावाखाली सिनिअर विद्यार्थ्यांकडून जुनिअरला बेदम मारहाण; शारीरिक व मानसिक शोषन

जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या नावाखाली बेदम मारहाण आणि शारीरिक-मानसिक शोषण केले जात असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे.

रॅगिंगच्या नावाखाली सिनिअर विद्यार्थ्यांकडून जुनिअरला बेदम मारहाण; शारीरिक व मानसिक शोषन

 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत (Residential school for neo-Buddhist children Jamkhed) लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या (Ragging in school) नावाखाली बेदम मारहाण आणि शारीरिक-मानसिक शोषण (Physical-psychological abuse) केले जात असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार (Deepak Kedar) यांनी केला आहे. केदार यांनी एक्स या आपल्या सोशल मिडिया अकांउटवर त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाहीत. वॉर्डन कुठे आहे? त्यांच्याकडून कोणतीही देखरेख नाही! शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या पैशांवर मुख्याध्यापक आणि कर्मचारी डल्ला मारत असल्याचा गंभीर आरोप आहे. मुलांच्या सह्यांचा गैरवापर करून बँकेतून पैसे काढले जात आहेत. मुलांच्या रूममध्ये काय चाललंय, याकडे कुणाचं लक्ष नाही. मुले आरडत-ओरडत असतानाही त्यांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही! या सर्व घटनेला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप केदार यांनी केला आहे. ही मुले येथे शिक्षणासाठी आली आहेत, पण त्यांना मिळत आहे अमानुष अत्याचार!

सामाजिक न्यायाची ही अवस्था आहे का? दलित, नवबौद्ध मुलांना वसतिगृहात जनावरांसारखं कोंडलं जात आहे. तुम्ही खुलताबादच्या नामकरणात आणि इतर किरकोळ गोष्टींमध्ये अडकले आहात, पण या मुलांच्या सुरक्षेचं काय? सामाजिक न्याय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असा सवाल केदार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना केला आहे. 

तात्काळ चौकशी: मुख्याध्यापक, शिक्षक, वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी. राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसवून त्याचा कंट्रोल सामाजिक न्याय विभागाकडे द्यावा ज्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहतील. वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापन करा. मुलांचं शोषण करणाऱ्या सर्वांवर अहिल्यानगर पोलीस अधीक्षकाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे.