रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यापीठाने काढला मार्ग; पण दाखला केव्हा मिळणार
न्यायालयाने समायोजनाच्या स्थगितीबाबत दिलेल्या आदेशावर पुर्नविचार/फेरविचार करण्याबाबत विद्यापीठाच्या वतीने न्यायालयास विनंती करण्यात येईल, असे विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यात आले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीमधील (Ratnadeep College)विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तोडगा (solution) काढल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
विद्यापीठाने विद्यार्थी व पालकांसाठी (Students and parents) एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून त्यात संबंधित विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय Class wise syllabus) ऑनलाईन-ऑफलाईन अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा दुस-या महाविद्यालयात घेण्याची कार्यवाही (Procedure for students to take written examination in another college) करण्यात येईल. न्यायालयाने समायोजनाच्या स्थगितीबाबत दिलेल्या आदेशावर पुर्नविचार/फेरविचार करण्याबाबत विद्यापीठाच्या वतीने न्यायालयास विनंती करण्यात येईल, असे विद्यार्थी आणि पालकांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रत्नदीप कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांना दाखले देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational loss of students) होत आहे. स्थलांतरित केलेल्या महाविद्यालयामध्ये दाखले उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठाने मार्ग काढावा, या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर (Pro-Vice Chancellor Dr. Parag Kalkar) यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून विद्यापीठाने हा मार्ग शोधून काढला आहे.विद्यार्थी शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत विद्यापीठात आंदोलनाला बसले होते. कॉलेजकडून दाखला मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी रात्री उशीरापर्यंत आंदोलन केले.
View this post on Instagram
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्याशी संवाद साधला. विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा व ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातील पत्रक विद्यापीठाच्या उप कुलसचिवांतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.जोपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही; तोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू राहील.
- कॅल्पेश यादव, सहसचिव, युवासेना
