सारथीच्या शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेशित "मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा" प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून "डॉ. पंजाबराव देशमुख - सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती" योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सारथी संस्थेअंतर्गत (Sarathi Institute) राबविण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना (Dr. Punjabrao Deshmukh Domestic Scholarship Scheme) २०२५-२६ साठी अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ sarthi.maharashtra.gov.in यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू (Online application process begins) शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना १६ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेशित "मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा" प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून "डॉ. पंजाबराव देशमुख - सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती" योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्थामध्ये पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना "डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती" प्रदान करण्याचा निर्णय सारथी संस्थेने घेतला आहे.
ही योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील नामांकित २०० शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी पदवी / पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास प्रवेशित "मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा" प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in आणि सारथी संस्थेच्या sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सारथीकडून करण्यात आले आहे.
मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. काहींनी कायमस्वरूपी शिक्षण सोडले. सरकारने शिष्यवृत्तीची व्यवस्था केली नसल्याने त्याचा परिणाम अनेक गरीब विद्यार्थ्यांवर झाला.