SRPF प्रियदर्शनी स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

डॉ.राजेंद्र सिंह म्हणाले, भाषेत आपली सस्कृती लपलेली आहे. त्यामुळे आपली मातृभाषा भाषा टिकली पाहिजे. अलीकडच्या काळात शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. आज कोणीही उठून शाळा सुरू करतो. पण शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधितांना काही अनुभव आहे का? हे शासन तपासत नाही.

SRPF प्रियदर्शनी स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.प्रामुख्याने खेळामुळे बुद्धी तेज बनते. विद्यार्थ्यांना आहार चांगला दिल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढते. मुलांना बेकरी पदार्थ देणे योग्य नाही. तसेच सध्या मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टीने अधोगती आणि प्रगती होते, हे पालकांनी तपासले पाहिजे,असे मत पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) पोलीस उपअधीक्षक (DySP) किशोर विटेकर यांनी व्यक्त केले. 

एसआरपीएफ प्रियदर्शनी स्कूल वानवडीच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंह , पूजा सिंह, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किशोर विटेकर बोलत होते.यावेळी महादेव गवारी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य आविष्कार करून दाखवले. आपल्या लहान मुलांना स्टेजवर नृत्य सादर करताना पाहून मुलांचे आई-वडील, आजी- आजोबा भारावून गेले. 

विटेकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी कष्ट घ्यावेत.त्याला निश्चितच यश प्राप्त होईल, पुणे ही वारकरी संप्रदायातील संतांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे पवित्र झालेली भूमी आहे.त्यामुळे येथील परिसरातून चांगले संस्कार मिळणार आहेत. परंतु, पालक जसे करतात तसे मूल वागतात.त्यामुळे पालकांनी तंबाखू खाऊ नये, कोणतेही व्यसन करू नये, असा सल्लाही विटेकर यांनी दिला.  
 
डॉ.राजेंद्र सिंह म्हणाले, भाषेत आपली सस्कृती लपलेली आहे. त्यामुळे आपली मातृभाषा भाषा टिकली पाहिजे. अलीकडच्या काळात शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. आज कोणीही उठून शाळा सुरू करतो. पण शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधितांना काही अनुभव आहे का? हे शासन तपासत नाही. परंतु, हे तपासूनच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी शाळेत जाणार आहे. जेथे शाळा नाही तेथेच शाळा सुरू केली पाहिजे. काही अपवाद वगळता अनेक इंग्रजी शाळा या विद्यार्थ्याला आपलआपले पाहण्यास शिकवतात.मात्र, शिक्षण हे समाज घडण्याचे केंद्र बिंदू आहे.