अकरावी प्रवेश नोंदणीचे नवीन वेळापत्रक जाहीर 

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार,  26 मे ते 3 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावी वर्गासाठी प्रवेश नोंदणी करता येणार आहे. २६ ते ३ जुन याच काळात विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येणार आहेत. त्यानुसार साधारणतः एकूण  9 दिवस ही प्रवेश प्रक्रिया सुरू असेल.

अकरावी प्रवेश नोंदणीचे नवीन वेळापत्रक जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे वेध लागले. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील (11th admission process) तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या आनंद आणि उत्साहावर विरजण पडले. 21 मे पासून सुरू होणारी अकरावीची प्रवेश प्रक्रियेला आता सोमवार 26 मे चा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यानुसार नवीन वेळापत्रक प्रसिद्ध (New schedule released) करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी आणखीन तीन दिवस प्रतीक्षा करावी वागणार आहे. 

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार 26 मे ते 3 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अकरावी वर्गासाठी प्रवेश नोंदणी करता येणार आहे. २६ ते ३ जुन याच काळात विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येणार आहेत. त्यानुसार साधारणतः एकूण  9 दिवस ही प्रवेश प्रक्रिया सुरू असेल. प्रवेश नोंदणी झाल्यानंतर 5 जून रोजी पहिली जनरल गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, 6 ते 7 जून या तारखांना विद्यार्थ्यांना हरकत नोंदवून तक्रार करता येईल. तसेच 8 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी अर्थात (फायनल मेरिट लिस्ट) जाहीर होईल. त्यानंतर लगेच ९ ते ११ जून रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल. १० जून रोजी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत लॉगिनमध्ये महाविद्यालय तपशील उपलब्ध होईल, तसेच फेरीनिहाय कट ऑफ पोर्टलवर प्रसिद्ध केला जाईल. १९ ते १८ जून या कालावधीत दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू केली जाईल. २० जून रोजी दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. 

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाच्या वर्षी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे एकाच अर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यभरातील सर्व महाविद्यालयांचा पर्याय खुला करण्यात आला आहे. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे.