कोकणातील पहिले अभिमत विद्यापीठ श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ डेरवण येथे औपचारिकपणे सुरू
यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य एनईपी-२०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, विद्यापीठाचे कुलपती विकास वालावलकर, कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणावली, रजिस्ट्रार डॉ. सुवर्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कोकणातील पहिले अभिमत विद्यापीठ श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ (Shri Vitthalrao Joshi Vidyapeeth) डेरवण येथे औपचारिकपणे सुरू (Officially launched) झाले. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar) यांच्याहस्ते विद्यापीठाच्या कोनशिलेचे अनावरण (Unveiling of the university's foundation stone) करण्यात आले. यावेळी त्यांनी हे विद्यापीठ भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच भविष्यात जागतिक स्तरावर अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य एनईपी-२०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषीमंत्री शशिकांत सुतार, विद्यापीठाचे कुलपती विकास वालावलकर, कुलगुरू डॉ. श्रीपाद बाणावली, रजिस्ट्रार डॉ. सुवर्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतातील शिक्षण व्यवस्थेत ज्ञानाबरोबर कौशल्य, संशोधन आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. केवळ पदवी देणाऱ्या संस्था नव्हे, तर समाजोपयोगी संशोधन करणारी विद्यापीठे निर्माण झाली पाहिजेत. डेरवणमधील हे विद्यापीठ त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले.
कुलपती विकास वालावलकर यांनी संस्थेच्या सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत विद्यापीठ स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. कोकणातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी भविष्यात डेक्कन कॉलेजमार्फत संयुक्त अभ्यासक्रम राबविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच डेरवण कॅम्पसचे कौतुक करत तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संकुलाची अनुभूती देणारा असल्याचे सांगितले. या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कोकण प्रदेशातील उच्च शिक्षणाच्या क्षितिजाला नवे आयाम मिळणार असून, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.