पेपरफुटीप्रकरणी उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन

मागील काही वर्षात सरळसेवा इतर भरती परीक्षांतील पेपरफुटीच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांनी काही उमेदवारांना अटक केली आहे.

पेपरफुटीप्रकरणी उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांचे विधानसभेत आश्वासन
Dy CM devendra Fadnavis

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरळसेवा भरती (Recruitment) परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी मंगळवारी ट्विटर वॉर (Twitter War) हे आंदोलन मंगळवारी करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही सहभाग घेतला. तसेच त्यांनी बुधवारीही हा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली.

मागील काही वर्षात सरळसेवा इतर भरती परीक्षांतील पेपरफुटीच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांनी काही उमेदवारांना अटक केली आहे. पण पेपरफुटीमध्ये गँग सक्रीय असल्याचा दावा समन्वय समितीकडून केला जात आहे. आगामी तलाठी भरतीतही ही गँग सक्रीय असल्याचे समितीचे म्हणणे आहे. कठोर कायदा झाल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही आणि तलाठी भरती परीक्षांचे पेपर केवळ TCS च्या अधिकृत ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात यावेत, या मागण्यांसाठी समितीने मंगळवारी ‘ट्विटर वॉर’ (Twitter War) आंदोलन केले. जितेंद्र आव्हाड यांनी #परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION, #पेपरफुटीवरकायदाकरा हे दोन हॅशटॅग वापरून आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

Twitter War : स्पर्धा परीक्षा आंदोलकांच्या ट्विटर वॉरमध्ये जितेंद्र आव्हाडांची उडी

या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी आव्हाड यांनी हा मुद्दा विधासनभेत उपस्थित केला. ते म्हणाले, पेपरफुटीमुळे विद्यार्थी अस्वस्थ आहोत. त्यासाठी कायदा किंवा उपाययोजना कराव्यात. २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने चांगले काम केले. पण यामध्ये गँग सक्रीय आहे. कुठेही पेपर घेतले तरी ते आव्हान देऊन फोडतात. लाखो विद्यार्थी गरीब, ग्रामीण भागातील आहेत. निवड झाल्यानंतर चांगले काम करतात. त्यामुळे त्यांत्या या अस्वस्थतेच्या उद्रेक होऊ नये, यासाठी उपाययोजना करायला हवी. त्यांच्या मनातील अस्वस्थता काढावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

त्यावर बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा केल्याचे सांगितले. ते म्हणाले, याबाबतीत एमपीएससीच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांनी आपली यंत्रणा बदलली आहे. ही यंत्रणा आणखी कशी फुलप्रुफ होईल, यासाठी तज्ज्ञ समिती करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

आंतरजिल्हा बदल्या केल्याशिवाय शिक्षक भरती नको! विधानसभेत आमदारांची मागणी

दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देताना आव्हाड यांनी मंगळवारी म्हटले होते की, स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे. पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे. यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार होतो आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD