घोटाळ्याचा आरोप महाजनांवर, गुन्हा मात्र IPS नवटकेंवर; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी राज्यातील TET, म्हाडा घोटाळा, आरोग्य पेपरफुटी यांसारखे सर्वात मोठे नोकर भरती घोटाळे उघडकीस आणले. ज्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अमुलाग्र बदल घडली आणि त्यामुळेच काही प्रमाणात प्रामाणिक उमेदवार नोकरीस लागू शकले.

घोटाळ्याचा आरोप महाजनांवर, गुन्हा मात्र IPS नवटकेंवर; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जळगाव पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर आहे,  मात्र CBI ने IPS अधिकारी भाग्यश्री नवटके (IPS officer Bhagyashree Navatake) यांच्यावर गुन्हा नोंदवला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) आपल्या 'एक्स' या सोशल मिडिया अकाउंट द्वारे केला आहे. IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी राज्यातील TET, म्हाडा घोटाळा, आरोग्य पेपरफुटी यांसारखे सर्वात मोठे नोकर भरती घोटाळे उघडकीस आणले. ज्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अमुलाग्र बदल घडली आणि त्यामुळेच काही प्रमाणात प्रामाणिक उमेदवार नोकरीस लागू शकले. पण अशा प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप घेऊन CBI ने गुन्हा दाखल केला आहे. खरं तर या पतसंस्थेतील घोटाळ्यात गिरीश महाजनांच्या सहभागावर सखोल तपास होणे गरजेचे आहे. गिरीश महाजन यांचा सहभाग या घोटाळ्यात निष्पन्न झाला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे. घोटाळेबाजांना पाठीशी घालावे आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांचा छळ... हीच वृत्ती आहे का? असा सवाल देखील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. 

जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवटके यांनी यांनी १,२०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे नेतृत्त्व केले होते. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे.