उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे भयान वास्तव..
केंद्र आणि राज्य सरकारकडून डिजिटल इंडिया आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या आणि मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेचे भयान वास्तव समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेली एक जिल्हा परिषद शाळाची दुरावस्था झाली असून गेल्या वर्षभरापासून ही शाळा अंधारात असल्याचे समोर आले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या शाळेच्या भयान वास्तवाला वाचा फोडली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्र आणि राज्य सरकारकडून डिजिटल इंडिया आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या आणि मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातील एका शाळेचे भयान वास्तव समोर (The true situation of the school was revealed) आले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेली (Kharamya Pada Zilla Parishad School) एक जिल्हा परिषद शाळाची दुरावस्था झाली असून गेल्या वर्षभरापासून ही शाळा अंधारात असल्याचे समोर आले आहे. मनसे नेते अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav) यांनी या शाळेच्या भयान वास्तवाला वाचा फोडली आहे. या घडनेमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्राची सध्याची दुरवस्था उघड झाली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध तक्रारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या कडे आल्या होत्या. या तक्रारिच्या आधारे जाधव यांनी शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेव्हा त्यांच्या समोर या जिल्हा परिषद शाळेबाबत एक वेगळंच वास्तव उभे राहिले. इयत्ता १ली ते ५वीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत एकूण ३९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे इयत्ता ते पाचवी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेला केवळ दोनच वर्ग खोल्या आहेत. ही ३९ मुले दोन वर्गात शिकत आहेत. एका वर्गात इयत्ता तिसरी ते पाचवी चे विद्यार्थी शिक्षण घेतात. तर दुसऱ्या वर्गात चौथी आणि पाचवी इयत्तेची विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मागील एक वर्षांपासून या शाळेत वीज नाही, अशी गंभीर बाब अविनाश जाधव यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आणली आहे. शाळेला लाईट नसल्याचे कारण त्यापेक्षाही वेगळे आहे. केवळ १५०० रुपयांचे वीज बील भरले नसल्यामुळे ही शाळा एक वर्ष एवढ्या प्रदिर्घ काळापासून अंधारात आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे आहे. परंतू, शाळेत वीज पुरवठा नसल्यामुळे गेले एका वर्षापासून हा टीव्ही धुळखात पडला आहे. वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक बेंच, गणवेश आणि दप्तर यांचा अभाव असल्याचेही चित्र अविनाश जाधव यांनी राज्याच्या आणि देशाचा समोर आणले आहे. विकासाच्या गप्पा मारणारे एकनाथ शिंदे आतातरी या अंधारलेल्या शाळेला प्रकाशात घेऊन येणार का? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळांची जर अशी परिस्थिती आहे तर महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागातील शाळांची काय परिस्थिती असेल. ठाणे जिल्हा प्रगतीकडे चालला आहे असे आपण म्हणतो, पण जर तुमच्या शाळाचं व्यवस्थित नसतील तर कसली प्रगती होत आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.