मंडपात दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा; पहिल्याच दिवशी गोंधळ; बोर्डाकडून दोषींवर कारवाई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आज शुक्रवार २० फेब्रुवारीपासून राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा मंडळाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीडच्या कुर्ला परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थांना मंडपात बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

मंडपात दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा; पहिल्याच दिवशी गोंधळ; बोर्डाकडून दोषींवर कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (State Board of Secondary Education) आज शुक्रवार २० फेब्रुवारीपासून राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्य मंडळाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. बीडच्या कुर्ला परीक्षा केंद्रावर (Beed Kurla Examination Center) दहावीचा पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थांना मंडपात बसवण्यात आल्याचा (The students sat in the pavilion) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियोजकांच्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या सुविधांमध्ये (Inadequate facilities for students) परीक्षेला समोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली. 

या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थी संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून येथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शिवाय तापमान वाढत असल्याने उकाड्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. बारावीनंतर दहावी परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे म्हणाले, बीडमधील मंडपातील परीक्षेबाबत शिक्षण अधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल मागविण्यात आयाला आहे.एनवेळी कोणताही पर्याय नसल्याने मंडपात परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागली. मात्र,याबाबत संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल.  

दरम्यान, दहावीच्या परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ५ हजार ११९ परीक्षा केंद्रांवर घेतल्या जात आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. कॉपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला असल्याची त्यांनी सांगितले.