12 वीच्या उत्तरपञिका जळून खाक, विद्यार्थ्यांचे भविष्य आगीत राख; कसा लावणार निकाल ?
१२ वीचे पेपर तपासणाऱ्या एका शिक्षकाच्या घराला आग लागल्याने त्यामध्ये उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य खाक तर होणार नाही ना अशी भिती निर्माण झाली असून निकाल कसा लावला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (10th-12th board exams 2024-25) सुरू असून या आठवड्यात संपणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला निकाल वेळेत लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा झालेल्या विषयांच्या पेपर तपासणीला वेग आले आहे. मात्र, १२ वीचे पेपर तपासणाऱ्या एका शिक्षकाच्या घराला आग लागल्याने (Answer sheets were burneAnswer sheets were burnedd) त्यामध्ये उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य खाक तर होणार नाही ना अशी भिती निर्माण झाली असून निकाल (board result ) कसा लावला जाणार याकडे लक्ष लागले आहे.
विरारमध्ये बारावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. शिक्षकाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या होत्या. त्यावेळी घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बारावीच्य उत्तरपत्रिकासुद्धा जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बोलिंज नानाभाट रोड इथल्या गंगुबाई अपार्टमेंटमला नुकतीच आग लागल्याची घटना घडली. याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेनं उत्तपत्रिका तपासायला घरी नेल्या होत्या. त्याच वेळी घराला अचानक आग लागली. या आगीत उत्तर पत्रिकांसा पूर्ण गठ्ठाच जळून खाक झाला. या घटनेमुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका या शाळेतच तपासणे बंधनकारक आहे. असे असताना शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का आणि कशा घरी नेल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिका सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने शाळेतच तपासायच्या असतात. शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.
________________________________________________
नियमानुसार दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाणे अपेक्षित नाही. त्यामुळे ज्या प्राध्यापकांने उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाऊ देण्यास परवानगी दिली असेल त्यांच्यावर आणि ज्यांच्या घरी आग लागून उत्तरपत्रिका जाळल्या आहेत त्यांच्यावर पण कारवाई होईल. सुदैवाने या उत्तरपत्रिका यापुर्वी तपासल्या गेलेल्या असून त्याच्या गुणपत्रिका शाळेत सबमिट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त काळजी करीत बसण्याची काही काळजी नाही.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री