अहिल्यानगर जिल्हा बँक भरतीत मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांकडे SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी
निकाल जाहीर करताना उमेदवारांची नावे, गावं काहीच दिलं नाही. फक्त रोल नंबर जाहीर केले गेले. बँकेच्या संचालक मंडळातील लोकांनी आपापल्या ओळखीतील लोकांना जागा वाटून घेतल्या आहेत. पात्र, प्रामाणिक उमेदवारांना डावलण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी सगळे या प्रकरणात गप्प का? सर्वांना घोटाळ्याची माहिती असूनही शांत आहेत, ही शांतता संशयास्पद वाटते. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. लोकशाहीत अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री साहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील एका प्रकरणावर तात्काळ पावलं उचलता, ही चांगली बाब आहे. पण याच जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेतील भरती घोटाळ्यावर (Ahilyanagar District Bank Recruitment Scam) तुम्ही इतके शांत का? या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. हा देखील तितकाच गंभीर प्रकार आहे. या प्रकरणात SIT मार्फत सखोल चौकशी (SIT inquiry) झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षा झिनत शबरिन (Zeenat Shabrin Congress leader) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
शिक्षण शिक्षिकेने शिक्षण घेतलेल्या संस्थेला दिली आयुष्यभराच्या पीएफची रक्कम
निकाल जाहीर करताना उमेदवारांची नावे, गावं काहीच दिलं नाही. फक्त रोल नंबर जाहीर केले गेले. बँकेच्या संचालक मंडळातील लोकांनी आपापल्या ओळखीतील लोकांना जागा वाटून घेतल्या आहेत. पात्र, प्रामाणिक उमेदवारांना डावलण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी सगळे या प्रकरणात गप्प का? सर्वांना घोटाळ्याची माहिती असूनही शांत आहेत, ही शांतता संशयास्पद वाटते. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. लोकशाहीत अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देखील शबरिन यांनी दिला आहे.
_____________________________________
मुख्यमंत्री साहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर ट्रस्टने केलेल्या बोगस भरती घोटाळ्याबाबत एकदम तत्परतेने ऍक्शन मोड मध्ये आला आहात ही चांगली गोष्ट आहे. पण याच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक भरती घोटाळ्याबाबत आपण एवढे उदासीन का आहात. प्रचंड मोठा घोटाळा आहे तो पण फक्त जिल्हा बँक आपल्या पक्षांच्या पदाधिकारी यांच्या ताब्यात आहे. सर्व संचालक मंडळींनी ह्या जागा वाटून घेतल्या आहे. निकाल लावताना कोणाचे ही नाव गाव काहीच जाहीर केले नाही फक्त रोल नंबर जाहीर केले. बघा जरा काही करता आला तर करा SIT मार्फत चौकशी.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य