चिंताजनक ! राज्यातील ३९४ शाळांमध्ये शून्य विद्यार्थी,' यू-डायस प्लस' नोंदणीतून झाले उघड
राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढेल असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
यु-डायस प्लस नोंदणीच्या (U-Dice Plus Registration) आकडेवारीतून राज्यातील शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एका बाजूला शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणाची कास धरत असताना आणि शिक्षण विभागातील विविध घटक दर दिवशी नवनवीन उपक्रमांची सुरुवात करत असताना राज्यातील ग्रामीण आणि डोंगराळ, दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र आहे. 'यूडायस-प्लस'वरील ३० सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या (Registration until September 30th) आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणींतील ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांची नोंदणी (Not a single student in 394 schools) झाली नसल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी बंधनकारक; आयुक्त कार्यालयाच्या शाळांना सूचना
'यूडायस-प्लस'वरील नोंदणीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक ३७ शाळांत एकाही विद्यार्थ्यांची नोंद झालेली नाही. रत्नागिरीतील २४, नागपूरमधील २३ शाळाही विद्याष्याविना आहेत. बुलढाण्यात २१ शाळांत शून्य पटसंख्या आहे. या आकडेवारीनुसार रलागिरी जिल्ह्यातील तब्बल ७१३ शाळांची पटसंख्या १० च्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत मोजकी विद्यार्थी संख्या आहे.
राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढेल असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.
मुंबई उपनगरांतही ३५० शाळा अशा आहेत ज्यामध्ये मोजकी विद्यार्थी संख्या आहे. मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत.
__________________________________
स्थानिक परिस्थिती आणि अन्य माध्यमांच्या शाळांमुळे राज्यातील ग्रामीण भाग तसेच दुर्गम व डोंगराळ भागातीस अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाला आहे की, त्या ठिकाणच्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे अशा शाळांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे.
महेंद्र गणपुले, माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ