आशा भोसलेंचे संगीत साता-समुद्रा पार गेले;मात्र शिक्षण किती झाले ?
गायिका आशा भोसले यांचे शिक्षण फार नव्हते. त्यांच्या सुरुवातीचे शिक्षण ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत झाले पण पुढे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी पूर्ण वेळ संगीतावर लक्ष देण्याचे ठरवले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आपल्या संगीताच्या जादूने जगभरातील अनेक संगीत प्रेमींचे गेली अनेक दशके मनोरंजन (Entertainment) करणारे आशाताईंचे स्वर हरपले, अशी बातमी आली अन् काळजात चिर्रर झालं. कारण हा धक्का कोणालाही न पचवणारा होता. भारतातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका (Famous playback singer) आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन (Asha Bhosle Passes Away) झाले आहे. शनिवारी, त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान काल दुपारी अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. शिक्षणाची (Asha Bhosle's Education) नौका हाती नसलेल्या आशाताईंनी संगित क्षेत्रात मात्र सातसमुद्र पार केले होते.
गायिका आशा भोसले यांचे शिक्षण फार नव्हते. त्यांच्या सुरुवातीचे शिक्षण ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत झाले पण पुढे त्यांचे वडील पंडित. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांनी पूर्ण वेळ संगीतावर लक्ष देण्याचे ठरवले. एकंदरीत, आशा भोसले यांचे संपूर्ण शिक्षण संगीतातच झाले आहे आणि संगीतातील त्यांचे पहिले गुरु हे त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर होते. कोल्हापूरातील भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूल या शाळेत आशा भोसले यांनी 1940 साली प्रवेश घेतला. पुढे आठ वर्षे त्या या शाळेत शिकल्या. मी शाळेतील सर्वात खोडकर मुलगी होते, असं म्हणत आशा भोसले या नेहमी कोल्हापुरातील विद्यापीठ हायस्कूलमधील शालेय आठवणींना उजाळा सांगायच्या, त्यामुळे आशाताईंना महाजन गुरुजींचा सतत ओरडा मिळायचा.
जरी शिक्षण झाले नसले तरी आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रात कळस गाठला होता. त्यांना त्यांच्या साहित्य अभ्यासावरून तसेच योगदानावरून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठातून डाॅक्टरेट्स पदव्या मिळवल्या. तसेच त्यांनी सॅलफोर्ड विद्यापीठ मधून पदवीचा अभ्यास केला आणि पदवीधर झाल्या. त्या जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या ‘Doctor of Literature’ (D.Litt.) प्राप्तकर्त्या होत्या. आशा भोसले यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवणारी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक गाभा मुख्य प्रवाहातील आणि जागतिक संगीतात पोहोचवण्याची त्यांची क्षमता. मग ते मराठी भावगीत असो वा हिंदी चित्रपटगीतं, प्रत्येक गाणं ही त्यांची ओळख बनली. आर. डी. बर्मन यांच्यासारख्या संगीतकारांसोबतच्या त्यांच्या सहकार्यानं भारतीय चित्रपट संगीताला एक नवी ओळख दिली. नवनवीन प्रयोगांमधून, त्यांनी केवळ बॉलिवूडच्या सुवर्णयुगालाच आकार दिला नाही, तर जागतिक प्रेक्षकांना भारतीय संगीताच्या समृद्धतेची ओळख करून दिली.