मुंबईसह कोकणात पावसाचा कहर! या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ठाणे जिल्ह्यात ४ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि खासगी शाळांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी घोषित करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्यांनाही हा आदेश लागू आहे.

मुंबईसह कोकणात पावसाचा कहर! या जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईसह कोकण आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता (Possibility of heavy rainfall) वर्तवण्यात आल्याने प्रशासनाने उच्च सतर्कता दाखवली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने ४ ते ६ जुलै या कालावधीत मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रेड अलर्ट जारी (Red alert issued) करण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर (Holidays declared for schools and colleges) करण्यात आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात ४ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि खासगी शाळांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी घोषित करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्यांनाही हा आदेश लागू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी शहरातही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व महापालिका आणि खासगी शाळांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली. त्याचप्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रादेशिक हवामान विभागाच्या रेड अलर्टनुसार सर्व स्तरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका शिक्षण विभागानेही शनिवार ४ जुलै २०२६ रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विविध माध्यमांच्या संस्थांना सुट्टी घोषित केली. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ४ जुलै रोजी सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.