राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, आता 'या' तारखेपासून होणार परीक्षा सुरू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ बाबत महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही ५ परीक्षा एप्रिल ते २ मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ (State Services Main Exam - 2025) आयोगाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २९ मार्च २०२६ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार होत्या. मात्र, काही उमेदवारांनी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सदर परीक्षा पुढे ढकण्याबाबत (Exams postponed) आयोगाकडे विनंती केली होती. उमेदवारांच्या विनंतीची विचार करून आयोगाने सुधारित वेळापत्रकानुसार (Revised schedule) आता ही परीक्षा ५ एप्रिल २०२६ ते २ मे २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी काही दिवसांचा शिल्लक कालावधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ बाबत महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार ही ५ परीक्षा एप्रिल ते २ मे या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतली जाणार आहे. पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी १४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.
आयोगातर्फे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर या वर्षी ८ जानेवारी व २० फेब्रुवारीला शुद्धिपत्रके प्रसिद्ध करत वाढीव पदांचा समावेश केला. त्यानुसार आता एकूण १३९ पदांच्या भरतीसाठी परीक्षाप्रक्रिया राबविली जात आहे. निवडप्रक्रियेच्या पुढील टप्प्यात पूर्वपरीक्षेमध्ये अर्हतापात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ चे आयोजन केले आहे. ५ एप्रिल ते २ मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील नाशिक, पुण्यासह अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नवी मुंबई या शहरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.
सुधारित वेळापत्रक -
०५ एप्रिल : भाषा (पेपर एक) आणि भाषा (पेपर दोन)
१८ एप्रिल : निबंध (पेपर तीन)
१९ एप्रिल : सामान्य अध्ययन-१ (पेपर चार) व सामान्य अध्ययन-२ (पेपर पाच)
२६ एप्रिल : सामान्य अध्ययन-३ (पेपर सहा) व सामान्य अध्ययन-४ (पेपर सात)
०२ मे : वैकल्पिक विषय (पेपर आठ), वैकल्पिक विषय (पेपर नऊ)
यापूर्वी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांवर आधारित परीक्षा घेतली जात होती. परंतु या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करताना आता वर्णनात्मक स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेत यश मिळविताना उमेदवारांचा कस लागणार आहे.
भाषा पेपर-एक आणि भाषा पेपर-दोन, प्रत्येकी तीनशे गुणांचे असतील. २५ टक्के गुणांसह अर्हता ग्राह्य धरली जाईल. गुणवत्तेसाठी गणना करण्यासाठी एकूण एक हजार ७५० गुणांच्या पेपर क्रमांक तीन ते नऊचे मूल्यमापन केले जाईल. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. पेपर क्रमांक तीन ते सातसाठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी कुठल्याही एका भाषेत लिहिण्याचा पर्याय असेल.
परंतु पाचही पेपर कुठल्याही एकाच भाषेत सोडविणे आवश्यक असतील. पूर्वपरीक्षेच्या अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमातून लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.