मराठवाडा विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीला वेग, नवीन नियमावलीनुसार अर्ज प्रक्रिया सुरू

राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यपद्धतीसंदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर केला. यानुसार 'एटीआर' भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली.

मराठवाडा विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीला वेग, नवीन नियमावलीनुसार अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) प्राध्यापक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी (73 posts in the professor category) राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार भरती (Recruitment as per new rules) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदरांना नव्याने 'एटीआर' भरावा लागणार असून, नवीन उमेदवारांनादेखील अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर (Registrar Dr. Prashant Amritkar) यांनी दिली. उच्छुक आणि पात्र उमेदवारांना केंद्र शासनाच्या समर्थ पोर्टलच्या माध्यमातून १२ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यपद्धतीसंदर्भात नुकताच शासन निर्णय जाहीर केला. यानुसार 'एटीआर' भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०- २०-२० याप्रमाणे अकॅडमिक रेकॉर्ड, अध्यापन कौशल्ये आणि मुलाखत याप्रमाणे ठरले आहे. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक प्रवर्गातील ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यात मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चार शाखांतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील सहायक प्राध्यापकांच्या ५३, सहयोगी प्राध्यापक ८ तर प्राध्यापक प्रवर्गातील ८ तसेच चार विद्या शाखांच्या अधिष्ठातांची पदे १ जानेवारी २०२४ पासून रिक्त आहेत. सध्या या पदांवर प्रभारी नेमणुका केलेल्या आहेत. या जाहिरातीनुसार चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांची पदे, तसेच ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक पद भरण्यात येणार आहे.

या जागांसाठी केंद्र शासनाच्या 'समर्थ पोर्टल'च्या माध्यमातून २६ फेब्रुवारी ते १२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर १८ मार्चपर्यंत आस्थापना विभागात दोन मुख्य प्रतीत दाखल करता येणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, असेही कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी सांगितले.