रेल्वेच्या ३२ हजार जागांसाठी १ कोटी अर्ज, प्रियांका गांधींनी मांडले बेरोजगारीचे विदारक चित्र
उमेदवारांनी एका भरतीसाठी केलेल्या अर्जाच्या स्थितीचा आढावा घेत त्यांनी म्हटले आहे की, देशातील बेरोजगारीची स्थिती पहा, रेल्वेमध्ये सुमारे ३२ हजार ग्रुप डी पदांसाठी १ कोटींहून अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी भाजपकडे कोणतेही ध्येय, धोरण नाही, त्यामुळे दरवर्षी लाखो तरुण बेरोजगार म्हणून पुढे येत आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress leader Priyanka Gandhi) यांनी पुन्हा एकदा बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गांधी यांनी 'एक्स; या आपल्या सोशल मिडियावर अकांउटवर ट्विट करत देशातील बेरोजगारीचे (Unemployment in the country) विदारक चित्र समोर आणले आहे. उमेदवारांनी एका भरतीसाठी केलेल्या अर्जाच्या स्थितीचा आढावा घेत त्यांनी म्हटले आहे की, देशातील बेरोजगारीची स्थिती पहा, रेल्वेमध्ये सुमारे ३२ हजार ग्रुप डी पदांसाठी (Railway recruitment 32 thousand Group D posts) १ कोटींहून अधिक अर्ज आले आहेत. बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी भाजपकडे कोणतेही ध्येय, धोरण नाही, त्यामुळे दरवर्षी लाखो तरुण बेरोजगार म्हणून पुढे येत आहेत.
राजस्थानमध्ये ५३ हजार चतुर्थ श्रेणीच्या पदांसाठी सुमारे २५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये बीए, बीएड, एमए, एमएड, एलएलबी, एमफिल, बीटेक, एमबीए आणि पीएचडी पदवी असलेले उच्च शिक्षित तरुणांची संख्या मोठी आहे, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोट्यवधी तरुणांकडे ना कोणतेही काम आहे ना भविष्यासाठी कोणतीही आशा आहे. या देशव्यापी समस्येबद्दल भाजपचा दृष्टिकोन असा आहे की ते बेरोजगार तरुणांना 'आकांक्षी तरुण' असे संबोधून त्यांची थट्टा करतात, परंतु त्यांच्या भविष्यासाठी भाजपकडे कोणतेही दूरदृष्टी नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.