फुले दाम्पत्यांनी देशात मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना केली - डॉ. नीलम गोऱ्हे

सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका तर होत्या परंतु त्या एक उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होत्या. मुलांनी शिक्षण सोडू नये यासाठी त्यांनी त्याकाळी स्टायफ़ंड सुरु केले होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांचा वसा कायम जपत आहे व यापुढेही जपत राहील आणि त्यांचा वसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल - कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी

फुले दाम्पत्यांनी देशात मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना केली - डॉ. नीलम गोऱ्हे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महिलांचे अधिकार (Women's rights) म्हणजेच मानवी अधिकार (human rights) आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि याची स्थापना महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात फुले दाम्पत्यांनी केली आहे असे उद्गार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Chairman Dr. Neelam Gorhe) यांनी काढले. सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) अथिति म्हणून उपस्थित होत्या याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास डॉ. नीलम गोऱ्हे, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रविंद्र शिंगणापुरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ. सागर वैद्य, ज्योत्स्ना एकबोटे, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारूशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य, अधिसभा सदस्य आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढे बोलताना, समाजाला जातीभेद, वंशभेद, स्त्री-पुरुष भेद या सगळ्या भेदांची टोचणी वाटण पुरेसे नसते तर त्यासाठी काहीतरी कृती करावी लागते असा संदेश सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी आयुष्यभर दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने तशी कृतिशीलता आपल्यात निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच समाजात वैचारिक सहिष्णुता निर्माण होणे गरजेचे आहे असे सांगितले.

सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका तर होत्या परंतु त्या एक उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होत्या. मुलांनी शिक्षण सोडू नये यासाठी त्यांनी त्याकाळी स्टायफ़ंड सुरु केले होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांचा वसा कायम जपत आहे व यापुढेही जपत राहील आणि त्यांचा वसा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल - कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एमबीए विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे यांनी अथिति यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. तर आभार सीएमए डॉ.चारूशीला गायके यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध कर्मचारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.