NTA मध्ये केवळ २४ कायम अधिकारी; ६.६ कोटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कंत्राटी यंत्रणेवर

नीट पेपरफुटीसह विविध परीक्षांतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी अधिक गंभीर ठरत आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून NTA च्या मनुष्यबळाच्या अभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कायमस्वरूपी सक्षम प्रशासकीय यंत्रणा नसल्याने जबाबदारी निश्चित करणे कठीण होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

NTA मध्ये केवळ २४ कायम अधिकारी; ६.६ कोटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा कंत्राटी यंत्रणेवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) प्रशासकीय रचनेतील कमकुवतपणा (Weaknesses in the administrative structure) पुन्हा एकदा समोर आला आहे. नुकत्याच संसदेत दिलेल्या माहितीनुसार, NEET, JEE आणि UGC-NET सारख्या महत्त्वाच्या परीक्षा (Important exams like NET)घेणाऱ्या NTA मध्ये केवळ २४ कायमस्वरूपी अधिकारी कार्यरत (24 permanent officers working) आहेत. २०१८ पासून आतापर्यंत ६.६ कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या परीक्षेची जबाबदारी (Responsibility for student exams) या संस्थेवर असताना इतक्या अल्प मनुष्यबळावर काम चालणे धक्कादायक मानले जात आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या लिखित उत्तरात स्पष्ट केले की, NTA मध्ये ३९ कायमस्वरूपी पदे मंजूर आहेत. यामध्ये महासंचालक, संयुक्त सचिव, संचालक, उपसंचालक आदी पदांचा समावेश आहे. मात्र सध्या फक्त २४ अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत किंवा प्रतिनियुक्तीवर भरली जात आहेत.

NTA मध्ये ७३ कंत्राटी कर्मचारी आणि १२४ आऊटसोर्स कर्मचारी कार्यरत आहेत. यात सल्लागार, युवा व्यावसायिक, डेटा विश्लेषक, कायदेशीर सहायक आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. महत्त्वाच्या परीक्षांच्या आयोजन, प्रश्नपत्रिका तयार करणे, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्यासारख्या संवेदनशील जबाबदाऱ्या या तात्पुरत्या यंत्रणेवर अवलंबून आहेत.

नीट पेपरफुटीसह विविध परीक्षांतील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी अधिक गंभीर ठरत आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून NTA च्या मनुष्यबळाच्या अभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कायमस्वरूपी सक्षम प्रशासकीय यंत्रणा नसल्याने जबाबदारी निश्चित करणे कठीण होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

इतक्या मोठ्या संख्येने परीक्षा घेणाऱ्या संस्थेला मजबूत आणि स्थिर प्रशासकीय रचना हवी. NTA ची क्षमता वाढवण्यासाठी अधिक कायम अधिकारी नेमणे आणि तंत्रज्ञानासह मनुष्यबळ सक्षम करण्याची मागणी आता जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांची विश्वासार्हता राखण्यासाठी ही सुधारणा आवश्यक आहे.