वंचित, दुर्बल, उपेक्षितांना 'लाॅ'च्या विद्यार्थ्यांनी भविष्यात न्याय मिळवून द्यावा; अजित पवार 

समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वंचित, दुर्बल, उपेक्षितांना 'लाॅ'च्या विद्यार्थ्यांनी भविष्यात न्याय मिळवून द्यावा; अजित पवार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पीडित बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी (Provide rights and justice to the weak, deprived, marginalized and suffering brothers and sisters) विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले. ते पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या (Shri Shivaji Maratha Society Law College) विद्यार्थ्यांसोबत मंत्रालय येथे आयोजित संवाद भेटीत बोलत होते. 

यावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी अजित पवार यांच्याशी मुक्त संवाद साधला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत राहवे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. भारतीय संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली.