इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकारकडे व्हिडिओ जारी करत मदतीची हाक

राणमध्ये शिकायला असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हृदयद्रावक व्हिडीओ जारी केला आहे. "आम्हाला माहित नाही पुढे काय होईल," अशा शब्दांत आपल्या मनातील भीती व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी भारतीय सरकारकडे तातडीने मदतीची आणि सुरक्षित मायदेशी परतण्याची विनंती केली आहे.

इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकारकडे व्हिडिओ जारी करत मदतीची हाक

 एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

इराण आणि इस्रायलमधील (Iran and Israel War) लष्करी संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, युद्धाच्या या छायेखाली इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न (Student safety issue) गंभीर झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, इराणमध्ये शिकायला असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हृदयद्रावक व्हिडीओ जारी (Video released) केला आहे. "आम्हाला माहित नाही पुढे काय होईल," अशा शब्दांत आपल्या मनातील भीती व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी भारतीय सरकारकडे तातडीने (Requested help from the Indian government) मदतीची आणि सुरक्षित मायदेशी परतण्याची विनंती केली आहे. या विद्यार्थ्यांचा मदत मागतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इराणमधील विविध शहरांत, विशेषतः तेहरान आणि शिराजमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय आणि उच्च शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांत इराणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे संपूर्ण इराणमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांनी जारी केलेल्या या व्हिडीओमध्ये सायरेनचे आवाज आणि आकाशात दिसणारे हल्ल्यांचे थरार स्पष्टपणे जाणवत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा असून इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे पालकांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे.

दरम्यान, भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांसाठी २४ तास कार्यरत असणारे हेल्पलाईन क्रमांक आणि व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केले आहेत. मात्र, युद्धाची तीव्रता वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. "आम्ही सध्या हॉस्टेलमध्ये आहोत, पण इथली स्थिती दर तासाला बदलत आहे, आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा," असे आवाहन या विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या शेवटी केले आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मिनाब शहरातील एका शाळेवर बॉम्ब पडला असून या हल्ल्यात कमीत कमी २४ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या प्रांतीय राज्यपालांनी तस्नीम या इराणी वृत्तसंस्थेला दिली. निरपराध विद्यार्थ्यांचे बळी गेल्याने संपूर्ण इराणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे, त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी भारत सरकारकडे मायदेशी परतण्याची विनंती केली आहे.