कशा थांबवणार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या? केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्वे
मसुद्यात समवयस्क विद्यार्थ्यांशी तुलना करण्यावर बंदी घालण्याची, शाळा स्तरावर वेलनेस टीम्सची स्थापना करणे, स्वत:ला हानी पोहोचवण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांचे समुपदेशन करणे आदी शिफारशी केल्या आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे (Students Suicide) प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी (School Students), महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश दिसतो. या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) शाळांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामध्ये काही महत्वपूर्ण शिफारशी करण्यात आल्या आहेत.
मसुद्यात समवयस्क विद्यार्थ्यांशी तुलना करण्यावर बंदी घालण्याची, शाळा स्तरावर वेलनेस टीम्सची स्थापना करणे, स्वत:ला हानी पोहोचवण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांचे समुपदेशन करणे, अपयशाला कायमस्वरूपी मानून आणि शैक्षणिक कामगिरीला यशाचा एकमेव आधार बनवण्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करणे, रिकाम्या वर्गखोल्या बंद करणे, अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये प्रकाशव्यवस्था करणे, उद्याने आणि इतर क्षेत्रे स्वच्छ ठेवणे आदी शिफारसी करण्यात आल्या आहेत.
खाजगी अनुदानित शाळांसाठी महत्वाची बातमी; विद्यार्थ्यांची मूल्यमापन चाचणी होणार
मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली स्कूल वेलनेस टीम (SWT) तयार केली जाऊ शकते. SWT मध्ये समुपदेशक, शिक्षक, आरोग्य अधिकारी, नर्स आदींचा समावेश असेल. आत्महत्येची चिन्हे दाखवणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटल्यावर, SWT तत्काळ कारवाई करू शकते. SWT कडून संबंधित विद्यार्थ्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.