पदभरती महाराष्ट्र शासनाची, परीक्षा मात्र गुजरातमध्ये..  

पदभरती राज्याची असताना परीक्षा मात्र, गुजरातमधील गांधीनगर येथे घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्याची भरती असताना परीक्षा गुजरातमध्ये घेण्याचा घाट कोणामुळे घातला जात आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ही परीक्षा गुजरातमधील एका एजन्सीमार्फत घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.  

पदभरती महाराष्ट्र शासनाची, परीक्षा मात्र गुजरातमध्ये..  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागातील फॉरेन्सिक लॅब भरती (Forensic Lab Recruitment) प्रक्रियेसाठी ५ एप्रिल रोजी लेखी परीक्षा (Written exam on April 5th) घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ही पदभरती राज्याची असताना ही परीक्षा मात्र, गुजरातमधील गांधीनगर येथे घेतली जाणार (The exam will be conducted in Gujarat) आहे. त्यामुळे राज्याची भरती असताना परीक्षा गुजरातमध्ये घेण्याचा घाट कोणामुळे घातला जात आहे ?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ही परीक्षा गुजरातमधील एका एजन्सीमार्फत घेतली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.  

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये १७ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत वैज्ञानिक सहायक ही पदे फॉरेन्सिक अॅप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (एफएसीटी) ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमधून भरली जात आहेत. तर सहायक रासायनिक विश्लेषकांची १६६ पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यासाठी ५ व ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 

या परीक्षेसाठी गुजरातमधील राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबसाठी ही पद भरती होत आहे. तेव्हा साहजिकच महाराष्ट्रातून अनेक उमेदवार परीक्षेसाठी पात्र असतील. मात्र महाराष्ट्रात परीक्षेसाठी एकही केंद्र नाही. गुजरात येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात असून, शासनाने या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.