'मुख्यमंत्री प्रशिक्षण योजने'चा फडणवीसांच्या हस्ते श्रीगणेशा...

नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारी हिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.

'मुख्यमंत्री प्रशिक्षण योजने'चा फडणवीसांच्या हस्ते श्रीगणेशा...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' (CM Youth Work Training Scheme) सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध ४०४ पदांवर प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेत नियुक्त पहिल्या प्रशिक्षणार्थी नेहा मंडारी (Appointed first trainee Neha Mandari) हिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पहिले नियुक्तीपत्र प्रदान (Grant of first letter of appointment) केले आहे. त्यामुळे या योजनेचा श्रीगणेशा फडणवीस यांच्या हस्ते झाले, असे म्हणता येईल. 

सिव्हित लाइन्स येथे निर्मित नवीन जिल्हा नियोजन भवनाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मनपामध्ये सामान्य प्रशासन विभागात नियुक्त लाभार्थी नेहा मंडारी हिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीपत्र दिले. नागपूर मनपातर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी - 9, कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदासाठी - 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठी- 4, विद्युत अभियांत्रिकी सहायक पदासाठी - 1, अग्निशामक विमोचक पदासाठी - 7, कनिष्ठ लिपिक पदासाठी - 6 व वायरमन पदासाठी - 2 प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये ४०४ पदांवर पात्र उमेदवारांकडून mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज मागवले आहेत. प्राप्त अर्जामधून आता प्रशिक्षणार्थीची निवड केली जात आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थीची निवड केली जात आहे. या योजनेअंतर्गत १२वी उत्तीर्ण उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपये आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे.