डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यीपीठाची भरती प्रक्रिया लांबणीवर 

विद्यापीठातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १६० पेक्षा अधिक आहे. त्यापैकी ७३ जागांवरील पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. पंधरा वर्षानंतर होत असलेल्या भरती  प्रक्रियेत २०२३ मध्येही अर्ज मागविण्यात आले होते. आता एप्रिल २०२५ मध्ये अर्ज मागविण्यात आले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यीपीठाची भरती प्रक्रिया लांबणीवर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) शिक्षकांच्या ७३ जागांसाठी नवीन कार्यपद्धतीनंतर (New procedures for 73 seats) अर्ज संख्या ३ हजार १८३ (Application number 3 thousand 183) एवढ्यावर आली. ऑनलाइन अर्जासह हार्डकॉपी जमा करण्याच्या मुदतीत अनेकांनी अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठात जमा केली. परंतु, त्याची छाननी प्रक्रिया अद्याप सुरू नाही. राज्य शासनाने भरतीसाठी जाहीर केलेल्या नवीन कार्यपद्धतीत बदल केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाने छाननी प्रक्रिया सुरू (The vetting process has not started) केली नसल्याचं सांगितलं जात आहे. 

विद्यापीठातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १६० पेक्षा अधिक आहे. त्यापैकी ७३ जागांवरील पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. पंधरा वर्षानंतर होत असलेल्या भरती  प्रक्रियेत २०२३ मध्येही अर्ज मागविण्यात आले होते. आता एप्रिल २०२५ मध्ये अर्ज मागविण्यात आले. त्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. राज्य शासनाने भरतीसाठी नवीन कार्यपद्धती जाहीर केली. त्यानुसार पंधरा दिवसांची मुदत देत नव्याने अर्ज, दुरूस्तीची प्रक्रिया करण्यात आली. १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन तर २४ डिसेंबरपर्यंत हार्ड कॉपी उमेदवारांना जमा करायची होती. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी जमा केली. परंतु, अद्याप छाननीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. 

नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना उमेदवारांना हार्ड कॉपी जमा करायची होती. उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी जमा केली. परंतु, अद्याप छाननीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. नवीन नियमावलीनुसार उमेदवारांना अध्यापन व संशोधन कार्य (एटीआर) भरणे आवश्यक होते. त्यानुसार ३ हजार १८३ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले. कार्यपद्धतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छाननी प्रक्रियेबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला नसल्याची चर्चा आहे. 

एप्रिल-मे मध्ये विद्यापीठाने केलेल्या प्रक्रियेत ४ हजार ६७३ एवढे अर्ज होते. नवीन कार्यपद्धतीत 'एटीआर'चा समावेश झाला. त्यानंतर नव्याने अर्ज भरण्यासह शिक्षक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्जात दुरुस्ती व काही अपग्रेडेशनही करण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यात अर्जसंख्या तीन हजार १८३ वर आली. आता कार्यपद्धतीत राज्य सरकारने बदल केल्यास पुन्हा विद्यापीठाकडून अशाप्रकारची प्रक्रिया केली जाऊ शकते, असं सांगितले.

विद्यापीठाने नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची १५ दिवसांची मुदतवाढ दिली. मुदतवाढीनंतर ऑनलाइन अर्ज संख्येत वाढ होण्याऐवजी अर्जसंख्याच दीड हजाराने घटल्याचे समोर आले. हार्ड कॉपी किती उमेदवारांनी केल्या याची छाननी झालेली नाही. त्यामुळे हार्ड कॉपीच्या संख्येबाबत निश्चिती नाही. सरकारच्या निर्णयाकडेही लक्ष असल्याचे अधिकारीसूत्रांनी सांगितले. तर हार्ड कॉपी जमा केलेली गट्ट्यांचा ढिग विद्यापीठात लागला आहे.