UPSC प्रिलिम्स उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला प्रोत्साहनपर मिळणार १ लाखांची रक्कम
तेलंगणा राज्यात नुकतीच 'राजीव गांधी नागरी अभयहस्तम' नावाची योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांनी यूपीएससी प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे हा, या योजनेचा उद्देश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यूपीएससी (UPSC) पुर्वपरीक्षा (preliminary examination) उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला प्रोत्साहनपर एक लाखांची रक्कम देण्याची (An amount of one lakh will be received) योजना तेलंगाणा सरकारने (Scheme of Telangana Govt) सुरू केली आहे. तेलंगणा राज्यात नुकतीच 'राजीव गांधी नागरी अभयहस्तम' (Rajiv Gandhi Civil Abhayhastam Scime) नावाची योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांनी यूपीएससी प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ते यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे हा, या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी (CM A. Revanth Reddy) यांनी केली आहे.
तेलंगणा सरकारच्या राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजनेचा लाभ राज्यातील मूळ रहिवाशांनाच मिळू शकेल. यासाठी उमेदवार हा राज्यातला स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. तेलंगणामधल्या सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे रेड्डी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी उमेदवाराने यूपीएससी प्रिलिम उत्तीर्ण केलेली असावी. त्या व्यतिरिक्त त्याचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. केंद्र किंवा राज्य सरकारमधल्या कोणत्याही स्थायी पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कोणत्याही उमेदवाराला नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होताना एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) ही केवळ देशातलीच नव्हे तर जगभरातल्या सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. त्यासाठी उमेदवारांना अनेक वर्ष अभ्यास करावा लागतो. आपल्या देशात दर वर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. त्यापैकी मोजक्याच लोकांना या परीक्षेत यश मिळते. उर्वरित उमेदवार पुढच्या वर्षासाठी पुन्हा तयारी करतात. प्रिलिममध्ये यश मिळालेले उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करतात. त्यांना अर्थसाह्य देण्यासाठी तेलंगण सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे.