नवीन नियमानुसार UPSC CSE पूर्व परीक्षेची तात्पुरती 'Answer Key'जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२६ ही २४ मे रोजी दोन सत्रांमध्ये घेतली होती. पहिले सत्र सकाळी ९:३० ते ११:३० पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी २:३० ते ४:३० पर्यंत घेण्यात आले.त्यानंतर आता उमेदवरांना पहिल्यांच पूर्व परिक्षा पूर्ण झाल्यावर तात्पुरती अन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२६ (Civil Services and Indian Forest Service Exam) ही २४ मे रोजी दोन सत्रांमध्ये घेतली होती. पहिले सत्र सकाळी ९:३० ते ११:३० पर्यंत तर दुसरे सत्र दुपारी २:३० ते ४:३० पर्यंत घेण्यात आले. त्यानंतर आता उमेदवरांना पहिल्यांच पूर्व परिक्षा पूर्ण झाल्यावर तात्पुरती अन्सर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अन्सर की प्रसिद्ध (Answer Key published) केली जात होती. मात्र, यंदा प्रथमच पूर्व परीक्षेची तात्पुरती अन्सर की जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या अन्सर की वर उमेदवारांना ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाच्या upsconline.nic.in या संकेतस्थळावरील “ऑनलाइन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल” वापरता येणार आहे, उमेदवारांनी उत्तरासह संक्षिप्त स्पष्टीकरण आणि तीन स्रोतांमधील पुरावे सादर करणे आवश्यक असेल.
नवीन नियमांनुसार, युपीएससीने परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तात्पुरती अन्सर की डाउनलोडसाठी उपलब्ध केली आहे. ही अन्सर की युपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही अन्सर की डाउनलोड करू शकता आणि प्रश्न व उत्तरे तपासून तुमच्या निकालाचा अंदाज लावू शकता. उत्तरपत्रिकेत दिलेल्या उत्तरावर उमेदवार समाधानी नसल्यास, ते ३१ मे पर्यंत आक्षेप नोंदवू शकतात. सर्व हरकती विषयतज्ज्ञांकडून तपासल्या जातील. तुमचा दावा बरोबर आढळल्यास, त्या उत्तरासाठी तुम्हाला गुण दिले जातील, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयोगाने पूर्व परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रथमच तात्पुरती अन्सर की प्रसिद्ध केली आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यंदा सुमारे ५.४९ लाख उमेदवारांनी ९३३ नागरी सेवा पदे आणि भारतीय वन सेवेतील ८० पदांसाठी परीक्षा दिली. मात्र, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम अन्सर की प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.