'ओपन टू ऑल' विशेष दुसऱ्या फेरीत ५४,३६९ प्रवेश निश्चित

यामध्ये सर्वाधिक मुंबई विभागातील १२ हजार ९९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे विभागातून ९ हजार ८२१ विद्यार्थी, नाशिक विभाग ६ हजार ७४९ विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर विभाग ६ हजार ६९२ विद्यार्थी, नागपूर विभाग ५ हजार ४२० विद्यार्थ्यी, कोल्हापूर विभाग ४ हजार ८७२ विद्यार्थी, अमरावती विभागातून ४ हजार ६९४ विद्यार्थी व सर्वात कमी लातूर विभागातून ३ हजार १२७ विद्यार्थ्याचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश आहे.

'ओपन टू ऑल' विशेष दुसऱ्या फेरीत ५४,३६९ प्रवेश निश्चित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी (11th online admission process) राबविण्यात येत असलेल्या 'ओपन टू ऑल'च्या दुसऱ्या विशेष फेरीअंतर्गत (Open to All Special Second Round) राज्यभरातून ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी (85 thousand 101 students get admission opportunity) मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्षात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. या फेरी अंतर्गत आत्तापर्यंत राज्यातील ५४ हजार ३६९ विद्यार्थांनी प्रवेश (54 thousand 369 students have secured admission) घेतला आहेत.

यामध्ये सर्वाधिक मुंबई विभागातील १२ हजार ९९४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे विभागातून ९ हजार ८२१ विद्यार्थी, नाशिक विभाग ६ हजार ७४९ विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर विभाग ६ हजार ६९२ विद्यार्थी, नागपूर विभाग ५ हजार ४२० विद्यार्थ्यी, कोल्हापूर विभाग ४ हजार ८७२ विद्यार्थी, अमरावती विभागातून ४ हजार ६९४ विद्यार्थी व सर्वात कमी लातूर विभागातून ३ हजार १२७ विद्यार्थ्याचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश आहे.

मुंबई विद्यापीठ : पदवी, पदव्युत्तरच्या प्रवेशाला २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यंदा राज्यात प्रथमच इयत्ता आकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील एकूण ९ हजार ५२८ कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५४ हजार ६९२ इतकी आहे. या जागांसाठी आतापर्यंत १४ लाख ७१ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १२ लाख २२ हजार २५० विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतले आहेत.

'ओपन टू ऑल' अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीत ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. प्राधान्य क्रमानुसार कला शाखेसाठी २३ हजार ९६१, वाणिज्य शाखेसाठी २४ हजार १४५ आणि विज्ञान शाखेसाठी ३६ हजार ९९५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील ५४ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये नियमित फेरीमध्ये एकूण ५१ हजार ७९६ इतके प्रवेश झालेले आहेत. तसेच व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत २ हजार ५७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.