NEET परीक्षा उद्या; प्रशासनाची जय्यत तयारी, विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
केंद्र शासनाने नीट परीक्षेसाठी लष्कराची मदत घेतली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे 21 जून रोजी होणारे नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडेल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे येत्या 21 जून रोजी (NEET) नीट परीक्षा घेतली जाणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत पोहोचणे बंधनकारक आहेत. दुपारी दीड नंतर एकाही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. NEET पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असले तरी सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. तसेच ही परीक्षा आपल्या आयुष्यातील शेवटची परीक्षा आहे, असे कोणीही समजू नये, जीवनात अनेक संधी उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ आत्मविश्वासाने ही परीक्षा द्यावी, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा आयोजित केली जाते. मात्र, 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर केंद्र शासनाने नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. नीट पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रात याबाबत मोठी उलथापालत झाल्याचे पाहायला मिळाले. मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, मनीषा हवालदार या तीन मनीषांना सीबीआयने ताब्यात घेतले. आरसीसी क्लास संचालक मोटेगावकर यालाही अटक करण्यात आली. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा रद्द केल्यामुळे तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यातूनच कॉक्रोज जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामेची मागणी केली.
विद्यार्थ्यांनी या सर्व परिस्थितीत पुन्हा एकदा अभ्यास करून नीट परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. केंद्र शासनाने नीट परीक्षेसाठी लष्कराची मदत घेतली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे 21 जून रोजी होणारे नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडेल,अशी आशा व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जावे, कोणताही ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.
_________________
विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास परीक्षेत मांडायचा आहे .विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरळीतपणे पार पडतील या विश्वासाने NEET च्या परीक्षेला सामोरे जावे. आजूबाजूला काय घडते आहे, हे पाहून स्वत:चे मन विचलित होऊ देऊ नका. मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. 21 जून रोजी होणारी परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. ही जीवनातील एक संधी आहे. जीवनात अनेक संधी आहेत. मात्र, या परीक्षेतून स्वत:ला न्याय देण्याचा प्रयत्न करा. या परीक्षेला अती महत्व देण्याची गरज नाही.
- दुर्गेश मंगेशकर, संचालक , आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र
____________________
आपण एका नवी परीक्षा देत आहोत, या स्परिटने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे. परीक्षा केंद्रांवर गेल्यावर पूर्वी काय घडले त्याचा कोणताही विचार मनात आणू नये . आपण पहिल्यांदाच परीक्षा देतोय,असे समजावे . भारतीय लक्षरांचे जवान केंद्रांवर असणार आहेत. त्यामुळे चूकीची घटना घडणार नाही याची काळजी घेतली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी दीड तास आधी केंद्रांवर जावे.15 मिनिटे जास्त दिली आहेत. त्यामुळे पुरेसा वेळ मिळणार आहे. ही जीवनातील अनेक परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. असे समजा ही यशस्वी झाला तर चांगलेच आहे. पण यश नाही मिळाले नाही म्हणून खचून जाऊ नका.
-हरीष बुटले, प्रवेश पूर्वी परीक्षांचे मार्गदर्शक आणि संस्थापक सचिव, डीपर,