धक्कादायक: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 4 विषयाच्या उत्तरपत्रिकेला शिक्षकाने जोडल्या वेगळ्या पुरवण्या;निकाल राखीव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एका विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखून ठेवला असून त्यात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असल्याचे समोर आले आहे. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाला मूळ उत्तरपत्रिका व  पुरवणी उत्तरपत्रिका यामध्ये हस्ताक्षर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले.

धक्कादायक: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 4 विषयाच्या उत्तरपत्रिकेला शिक्षकाने जोडल्या वेगळ्या पुरवण्या;निकाल राखीव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याच्या एक दोन नव्हे तर तब्बल चार विषयाच्या उत्तरपत्रिकांना एका शिक्षकाने स्वतःच्या हस्ताक्षरातील पुरवणी उत्तरपत्रिका जोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यावर कोकण विभागीय मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एका विद्यार्थ्यांचा निकाल राज्य मंडळाने राखून ठेवला असून त्यात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असल्याचे समोर आले आहे. उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाला मूळ उत्तरपत्रिका व  पुरवणी उत्तरपत्रिका यामध्ये हस्ताक्षर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी शिक्षण अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या तपासात संबंधित विद्यार्थ्याच्या चार वेगवेगळ्या विषयाच्या उत्तर पत्रिकांमध्ये वेगळ्या हस्तक्षेतील पुरवणी उत्तरपत्रिका जोडल्या असल्याचे आढळून आले आहे. 

देशभरात नीट पेपर फुटीमुळे वातावरण तापलेले आहे. पेपर सेट करणाऱ्या शिक्षकांनीच नीट चा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. त्यात आता शिक्षकानेच विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेत पुरवण्या जोडल्याचे आढळून आले आहे. यात एका मुख्याध्यापकाचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. 

राज्य मंडळात कोकण विभाग स्थापनेपासूनच निकालात नेहमी पहिल्या क्रमांकावर आला आहे. मात्र कोकण विभागात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत अशा पद्धतीने पुरवण्यात जोडल्यामुळे यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या का ? असं संशय व्यक्त केला जात आहे.