विद्यापीठात आणखी एका प्रभारी अधिकाऱ्याची भर; परीक्षा संचालकांचा कार्यकाल संपुष्टात 

विद्यापीठात आणखी एका प्रभारी अधिकाऱ्याची भर; परीक्षा संचालकांचा कार्यकाल संपुष्टात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)महत्त्वाची विविध पदे रिक्त आहेत.त्यात आता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यपामन मंडळ विभागाचे संचालक डॉ.महेश काकडे (Director of Examination Department Dr. Mahesh Kakade)यांचा कार्यकाल संपणार असल्याने परीक्षा नियंत्रक अर्थात परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक पद रिक्त होणार आहे. परिणामी विद्यापीठातील प्रमुख अधिकाऱ्यांमधील आणखी एका पदावर प्रभारी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.त्यामुळे प्रशासकीय , शैक्षणिक कामकाजानंतर आता काटेरी मुकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी कोण स्वीकारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

विद्यापीठाचे कुलसचिव,चारही अधिष्ठाता प्रभारी आहेत.प्रभारी अधिकारी असल्याने विविध विद्यार्थी संघटना व इतर संघटनांनी वेळोवेळी पूर्णवेळ पद भरण्याबाबत विद्यापीठाकडे अनेक वेळा निवेदने दिली.मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता , बदलेले आरक्षण,राज्यपाल कार्यालयाकडून भारती प्रक्रियेवर घातलेले निर्बंध या व अशा अनेक कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.त्यात आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षा विभागाची जबाबदारी सुध्दा प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपवावी लागणार आहे. अन्यथा काकडे यांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. 

पुणे विद्यापीठाचा 76 वा वर्धापन येत्या 10 फेब्रुवारी रोजी असून  त्यानंतर लगेचच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यपामन मंडळ विभागाचे संचालक डॉ.महेश काकडे यांचा कार्यकाल संपणार आहे.त्यामुळे विद्यापीठातील किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील एखाद्या अनुभवी प्राध्यापकाकडे प्रभारी म्हणून परीक्षा विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी द्यावी लागणार आहे.सर्वसाधारणपणे एखाद्या अधिकाऱ्याचा कार्यकाल संपणार असेल तर अशा अधिकाऱ्याच्या पदाची भरती प्रक्रिया सहा महीने आधी राबवणे अपेक्षित होते.परंतु, सर्वच प्रभारी असल्याने याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.त्यामुळे विद्यापीठात प्रभारी अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यावर राज्य शासन व विद्यापीठ प्रशासनाने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.अन्यथा विद्यापीठासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिले,असे विद्यापीठाच्या हितचिंतकांकडून सांगितले जात आहे.